मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra weather update: विदर्भात पारा ४० पार! वर्धा राज्यात सर्वाधिक उष्ण; २८ तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता

Maharashtra weather update: विदर्भात पारा ४० पार! वर्धा राज्यात सर्वाधिक उष्ण; २८ तारखेनंतर राज्यात पावसाची शक्यता

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Mar 26, 2024 06:16 AM IST

Maharashtra weather update: राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वर्धा, सोलापूर, अकोला जिल्ह्यात सर्वाधिक तपमानाची नोंद झाली.

राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे.
राज्यात तापमानात वाढ झाली आहे. विदर्भ मराठवाड्यात तापमान मोठ्या प्रमाणात वाढले आहे. (Pixabay )

Maharashtra weather update: विदर्भात सध्या मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. वर्धा, अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यात पारा ४० शी पार गेला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. २८ तारखेनंतर राज्यात वातावरण ढगाळ राहणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

CTA icon
तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai News: मुंबईत धुलिवंदनाच्या आनंदाला गालबोट, माहीमच्या समुद्रात ५ तरुण बुडाले

पुणे वेध शाळेने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यावर कोणतेही खास हवामांची यंत्रणा नाही. साउथ इंटेरियर कर्नाटका ते विदर्भावर असलेली द्रोणीका रेषा किंवा हवेची विसंगती अजून कायम आहे. त्यामुळे उत्तर-पूर्व वारे गुजरात वरून जाऊन राज्यात विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात आद्रते सोबत गरम हवा घेऊन येत आहे. अजून एक पश्चिमी विक्षोभ २९ मार्च पर्यंत उत्तर भारतावर प्रभाव करणार आहे. त्यामुळे राज्याच्या उत्तरी मध्य भागात २८, २९ आणि ३० मार्च दरम्यान आद्रततेत वाढ होण्याची शक्यता आहे. तर राज्याचे हवामान कोरडे राहील. २८ नंतर ढगाळ हवामान वाढण्याची शक्यता आहे. २९ ते ३० मार्चला राज्याच्या उत्तरी मध्य भागात वेळोवेळी आकाश अंशत: ढगाळ राहील. ३१ मार्च नंतर ढगाळ हवामान कमी होईल. २७ ते ३० मार्च पर्यंत तापमानात वाढ होणार आहे. राज्याच्या उत्तरी मध्य भागात २८ ते ३० मार्चच्या दरम्यान हळूहळू आद्रतेत किंचित वाढ होण्याची शक्यता आहे. राज्याचे हवामान बदलणार नाही. २८ तारखेनंतर हळूहळू वातावरण ढगाळ होण्याची शक्यता आहे. २७ ते ३० मार्चपर्यंत किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

Ajit Pawar : 'खावा कुणाचेही मटण, दाबा तुतारीचे बटण', नणंद-भावजयीच्या लढाईत वहिनींची एंट्री, अजित'दादा'ला धक्का

पुणे व परिसरातील तीन ते चार दिवस आकाश मुख्यत: निरभ्र राहण्याची शक्यता आहे. २८ मार्चला संध्याकाळ नंतर ढगाळ वातावरणात वाढ होईल. तर २८ ते ३० मार्चच्या दरम्यान पण एक ते दोन डिग्रीने तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. ३१ मार्च नंतर ढगाळ वातावरणात घट होईल. तर अंशतः ढगाळ वातावरणात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

विदर्भ तापला

राज्यात सोमवारी वर्धा जिल्ह्याचे तापमानात सर्वाधिक होते. विदर्भात तापमान ४०.८ डिग्री सेल्सिअस तर अकोला अमरावती, बुलढाणा जिल्ह्यात तापमान ४०.१ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. सोलापूर येथेही तापमान ४० डिग्री सेल्सिअस नोंदवले गेले.

मुंबईच्यात तापमानात थोडी घट झाली मुंबईचे तापमान ३१ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले. तर पुण्यात देखील तापमान सोमवारी ३८.८ डिग्री सेल्सिअस नोंदवल्या गेले.

IPL_Entry_Point