मंत्रालयात पाण्याच्या बाटल्यांवर बंदी; सुसाईड रोखण्यासाठी शिंदे सरकारचा निर्णय
Jul 19, 2022, 01:24 PM IST
- Decision of Home Department : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला होता. त्यानंतर चेंकिंगची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारनं मंत्रालयात पाण्याच्या बाटल्या नेण्यावर बंदी घातली आहे.
Decision of Home Department : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला होता. त्यानंतर चेंकिंगची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारनं मंत्रालयात पाण्याच्या बाटल्या नेण्यावर बंदी घातली आहे.
- Decision of Home Department : काही वर्षांपूर्वी मंत्रालयात आत्महत्या करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला गेला होता. त्यानंतर चेंकिंगची सुरक्षा वाढवण्यात आली होती. आता हीच गोष्ट लक्षात घेऊन राज्य सरकारनं मंत्रालयात पाण्याच्या बाटल्या नेण्यावर बंदी घातली आहे.
Shinde Fadnavis Govt In Maharashtra : राज्यात सरकार स्थापन होऊन १९ दिवस उलटलेले असताना अजूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. त्यामुळं मंत्रालयातील अनेक कामं रेंगाळली असल्यानं लोकांची निराशा होत आहे. राज्यातील अनेक लोक त्यांची कामं घेऊन मंत्रालयात येत असतात. काम झालं नाही तर निराश होऊन मंत्रालयातच आत्महत्या करण्याचे अनेक प्रकार घडलेले आहेत. अशा घटनांना चाप लावण्यासाठी आता शिंदे सरकारनं एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत मंत्रालयात प्रवेश करताना नागरिकांच्या खिशात तंबाखू किंवा गुटख्याच्या पुड्या आहेत का, याची तपासणी केली जात होती. परंतु आता मंत्रालयात प्रवेश करत असताना नागरिकांनी पाण्याच्या बाटल्या आत न नेण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच मंत्रालयात विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न झाला होता, त्यानंतर आता गृह विभागानं हा निर्णय घेतला आहे.
सरकारनं आपले प्रश्न सोडवावेत, यासाठी अनेक नागरिक आपले गाऱ्हाणे मंत्रालयात घेऊन येत असतात. त्यावेळी त्यांनी कोणताही अनुचित प्रकार करू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं बोललं जात आहे. याशिवाय सध्या सर्वसामान्य लोकांना मंत्रालयात आकाशवाणीसमोरील गेटवरूनच प्रवेश देण्यात येत असून आत येणाऱ्या नागरिकांची कसून चौकशी करण्यात येत आहे. गेट पास व ओळखपत्र नसल्याशिवाय कोणत्याही नागरिकाला प्रवेश देण्यात नाहीये. त्याचबरोबर आत जाणाऱ्या नागरिकांना पाण्याची बाटली आत घेऊन जाण्यावरही बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळं नागरिकांमध्ये तारांबळ उडाली आहे.