Athiya Shetty-KL Rahul: ३० लाखांचं घड्याळ ते ५० कोटींचा फ्लॅट; अथिया-केएल राहुल लग्नात मिळाले महागडे गिफ्ट्स!
Jan 26, 2023, 08:22 AM IST
- Athiya Shetty-KL Rahul wedding gifts: अथिया आणि केएल राहुलला लग्नात आहेर म्हणून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. यापैकी काही गोष्टींची माहिती समोर आली आहे.
Athiya Shetty-KL Rahul wedding gifts: अथिया आणि केएल राहुलला लग्नात आहेर म्हणून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. यापैकी काही गोष्टींची माहिती समोर आली आहे.
- Athiya Shetty-KL Rahul wedding gifts: अथिया आणि केएल राहुलला लग्नात आहेर म्हणून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. यापैकी काही गोष्टींची माहिती समोर आली आहे.
Athiya Shetty-KL Rahul wedding gifts: बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची याची लेक अभिनेत्री मुलगी अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल यांनी २३ जानेवारी रोजी लग्नगाठ बांधली आहे. अथिया आणि केएल राहुलने कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या जोडप्याने सोशल मीडियावर लग्नाचे फोटोही शेअर केले, जे मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील फार्महाऊसवर अथिया-केएल राहुलचा लग्न सोहळा पार पडला. अथिया आणि केएल राहुलला लग्नात खूप महागडे गिफ्ट्स मिळाले आहेत.
अथिया आणि केएल राहुलला लग्नात आहेर म्हणून अनेक महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत. यापैकी काही गोष्टींची माहिती समोर आली आहे. केएक राहुल आणि अथियाला लग्नात लक्झरी आणि महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुनील शेट्टीने या जोडप्याला मुंबईत एक सुपर लक्झरी अपार्टमेंट गिफ्ट केला आहे, ज्याची किंमत सुमारे ५० कोटी रुपये आहे. जॅकी श्रॉफने या जोडीला घड्याळ भेट दिले आहे, ज्याची किंमत सुमारे ३० लाख रुपये आहे. अभिनेता अर्जुन कपूरने १.५ कोटी रुपयांचे डायमंड ब्रेसलेट, तर सलमान खानने १.६४ कोटी रुपयांची ऑडी कार भेट दिली आहे. महेंद्रसिंह धोनीने आपल्या लाडक्या मित्राला बाईक भेट दिली आहे, जिची किंमत सुमारे ८० लाख रुपये इतकी आहे. तर, विराट कोहलीने या जोडीला एक BMW कार भेट दिली आहे, जिची किंमत सुमारे २.१७ कोटी रुपये आहे.
अथिया आणि केएल राहुल दोघेही खूप दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. दोघांनी खंडाळ्यातील बंगल्यात अत्यंत साध्या पद्धतीने सात फेरे घेतले. राहुल आणि अथियाच्या लग्नाला फक्त जवळच्या लोकांनीच हजेरी लावली होती. मात्र, काही दिवसांनंतर भव्य स्वागत समारंभ होणार असून, त्यात सुमारे ३ हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.