मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  इंडिया आघाडीत जागावाटपासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला तयार, खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं!

इंडिया आघाडीत जागावाटपासाठी काँग्रेसचा फॉर्म्युला तयार, खरगे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काय ठरलं!

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Jan 05, 2024 07:43 AM IST

Lok Sabha Election 2024: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशातील सगळ्याच पक्षांनी कंबर कसली आहे.

Congress workers
Congress workers (PTI)

Lok Sabha Elections Congress Formula: आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी रणनीती तयार करण्यास सुरुवात केली. दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी गुरुवारी पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात तसेच, राहुल गांधींच्या आगामी ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या आयोजनावर चर्चा झाली. या बैठकीला उपस्थित असलेल्या प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी राज्यामध्ये काँग्रेस किती जागांवर दावा केला पाहिजे, यासंदर्भात खरगे आणि राहुल गांधी यांच्याकडे आग्रही मत मांडल्याचे समजते. दरम्यान, महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या जागावाटपाबाबत पुढील आठवड्यामध्ये अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

ट्रेंडिंग न्यूज

बिहार काँग्रेस नेत्यांनी सांगितले की, वाम दल आणि काँग्रेसने २५ जागांची मागणी केल्यास पक्षाला १०- १२ जागा मिळू शकतात. नेत्यांनी सांगितले की आम्हाला युती हवी आहे आणि जेडीयू आणि आरजेडीला सामावून घेण्याचा प्रश्न आहे, जिथे आम्ही मागे पुढे करायला तयार आहेत. झारखंडच्या नेत्यांनी सांगितले की आम्ही १२ जागेवर दावा केला पाहिजे. तसेच ७ पेक्षा कमी जागेवर सहमती दर्शवायची नाही.

बैठकीत यूपी काँग्रेसच्या नेत्यांनी ४० जागांसाठी इच्छा व्यक्त केली. मात्र समाजवादी पक्षाशी झालेल्या चर्चेनंतर त्यांना २० जागा मिळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी बंगालच्या नेत्यांनी आपण ६ जागांची मागणी करू, असे सांगितले. तसेच किमान ४ जागा मिळाल्या पाहिजेत, असेही त्यांनी म्हटले आहे.

पंजाब काँग्रेस आम आदमी पार्टीसोबत युती करण्याच्या विरोधात आहे, विशेष म्हणजे युती समितीने पंजाबसाठी आपला अहवाल सादर केलेला नाही, जो प्रत्यक्षात पंजाबमधील आप-काँग्रेस युतीसाठी रेड अलर्ट आहे.

काँग्रेस पक्षातील नेत्यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती, जाहीरनामा आणि जागावाटपावर चर्चा केली. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पक्षाच्या नेत्यांना मतभेद विसरून एकत्र येण्यास सांगितले आणि पक्षाच्या बाहेरील संवेदनशील मुद्द्यांवर बोलू नका कारण यामुळे अनेकदा पेच निर्माण होतो.

IPL_Entry_Point