Terav: संकटांना न घाबरता लढणाऱ्या शेतकरी महिलेची कथा! 'तेरवं' चित्रपटाचा ट्रेलर पाहिलात का?
Terav Marathi Movie: ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
Terav Marathi Movie: सध्या मराठी मनोरंजन विश्वात ‘तेरव’ या चित्रपटाची चर्चा पाहायला मिळत आहे. या चित्रपटात एका ज्वलंत समस्येवर भाष्य केलं जाणार आहे. विदर्भातील दुष्काळग्रस्त भागातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या महिलेची कथा या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. येत्या ८ मार्चला महिला दिनी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ घातलेल्या 'तेरव' बहुचर्चित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लॉन्च करण्यात आला.
ट्रेंडिंग न्यूज
‘तेरव’ चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करताना नितीन गडकरी यांनी या चित्रपटाचं कौतुक केलं. विदर्भाच्या मातीतून असे चित्रपट यायला हवेत आणि आपल्या समस्या मांडल्या जायला हव्यात, असे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी हा ट्रेलर लॉन्च सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी चित्रपटाचे लेखक श्याम पेठकर, संगीतकार वीरेंद्र लाटणकर, अभिनेत्री नेहा दंडाळे, श्रद्धा तेलंग, देवेंद्र लुटे ही कलावंत मंडळी आवर्जून उपस्थित होती.
Sai Tamhankar: ‘महाराष्ट्राची हास्याजत्रा’मधून सई ताम्हणकरही झाली गायब! अभिनेत्रीच्या पोस्टने चर्चांना उधाण
काय आहे कथानक?
‘तेरव’ हा चित्रपट आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील एकल महिलांच्या जीवन संघर्षावर बेतलेला आहे. त्या संकटांना न घाबरता कसा लढा देतात, हे या चित्रपटात दाखवले आहे. या चित्रपटात किरण खोजे, संदीप पाठक, किरण माने, नेहा दंडाळे या प्रस्थापित कलावंतांसह विदर्भातील मधुभैया जोशी, श्रद्धा तेलंग, प्रभाकर आंबोने, वत्सला पोलकमवार, प्रवीण इंगळे, देवेंद्र लुटे, यशवंत चोपडे, शर्वरी पेठकर, संहिता इथापे, वैदेही चौरे, दिलीप देवरणकर या कलावंतांनी भूमिका केल्या आहेत. सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी दिवंगत शंकर बडे यांच्या कवितेला गाण्याचा साज देण्यात आलेला आहे. चित्रपटाचे मुख्य गाणे ज्ञानेश वाकुडकर यांनी लिहिले आहे.
नितीन गडकरी यांनी केलं कौतुक!
विदर्भ मराठवाडा खानदेश या कापूसपट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आत्महत्या होतात. हा एक अत्यंत संवेदनशील विषय आहे आणि 'कॉटन सॉईल तंत्र' या विषयावर या संदर्भात काम होणे गरजेचे आहे; पण श्याम पेठकर यांनी याआधी 'गोष्ट छोटी डोंगराएवढी' या चित्रपटाच्या माध्यमातून शेतकरी आत्महत्या विषय अत्यंत परिणामकारक पद्धतीने मांडला होता. आता आगामी ‘तेरव’ या चित्रपटातून त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील त्या शेतकऱ्याची मागे एकटी उरलेली पत्नी म्हणजे एकल महिला यांच्या संघर्षावर चित्रपट लिहून लढण्याची उर्मी देणारा चित्रपट निर्माण केलेला आहे. विदर्भातील प्रयोगशील नाट्यदिग्दर्शक हरीश इथापे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन उत्तमपणे केलेले आहे. व्यावसायिक कमाई करू न देणाऱ्या चित्रपटाच्या मागे निर्माता म्हणून उभे राहण्याची संवेदनशीलता 'अंजनी कृपा प्रोडक्शनच्या' माध्यमातून निर्माता नरेंद्र जीचकर यांनी दाखवली याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो आणि हा चित्रपट सगळ्यांनी आवर्जून बघावा असे आवाहन करतो, असे नितीन गडकरी म्हणाले.
विभाग