मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घेणार दीपाचा बदला! मालिकेत मोठा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: १४ वर्षांच्या तुरुंगवासानंतर कार्तिक घेणार दीपाचा बदला! मालिकेत मोठा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Feb 28, 2023 03:47 PM IST

Rang Maza Vegla latest update: ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत तब्बल १४ वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. मात्र, १४ वर्षांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेला कार्तिक इनामदार आता पत्नी दीपाचाच बदला घेणार आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla latest update:रंग माझा वेगळा’ या मालिकेने छोट्या पडद्यावर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. लवकरच या मालिकेत पुन्हा एकदा मोठा लीप पाहायला मिळणार आहे. या आधी देखील मालिकेत ५ वर्षांचा लीप आला होता. तर, आता या मालिकेत तब्बल १४ वर्षांचा लीप दाखवण्यात येणार आहे. मात्र, १४ वर्षांचा तुरुंगवास भोगून बाहेर आलेला कार्तिक इनामदार आता पत्नी दीपाचाच बदला घेणार आहे. मालिकेचा नवा प्रोमो बघून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. मात्र, आता या मागचे कारण समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लीप येणार असून, या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय. यातही कार्तिकने स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी पोलिसांच्या तावडीतून पळ काढला होता. यावेळी त्याने साक्षीच्या मुलाची मदत घेत स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण प्रयत्न केला.

यावेळी त्याने सत्य समोर आणण्याचा प्रयत्न देखील केला. मात्र, यात तो स्वतःच अडकला. यावेळी दीपाशी बोलत असतानाच साक्षीच्या पतीच्या प्लॅनमुळे पोलिसांच्या तावडीत अडकतो. यावेळी पुन्हा एकदा कार्तिकच्या मनात दीपाविषयी गैरसमज निर्माण केला जातो. दीपानेच कार्तिकला पकडून दिले, असे त्याला सांगितले जाते. याचाच राग कार्तिकच्या मनात राहिला आहे. हाच राग मनात धरून तब्बल १४ वर्षानंतर तुरुंगाबाहेर आलेला कार्तिक दीपाकडून बदला घेणार आहे.

काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानकही १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. या १४ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. १४ वर्षांनंतर शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र, आता दीपाचा वनवास सुरू होणार आहे.

IPL_Entry_Point