Rakhi Sawant: लग्नानंतर राखी सावंत आणि आदिलच्या नात्यात दुरावा? अभिनेत्रीने व्यक्त केली ‘ही’ खंत!
Rakhi Sawant Marriage : आदिलमुळेच लग्नाची बातमी सार्वजनिकरीत्या सांगितली नव्हती, असे राखी एक मुलाखतीत म्हणाली आहे.
Rakhi Sawant Marriage : बॉलिवूडची ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत सध्या तिच्या लग्नामुळे प्रचंड चर्चेत आली आहे. राखीने बॉयफ्रेंड आदिल दुर्रानीसोबत लग्न केले आहे. या लग्नाला तिने गेल्या सात महिन्यांपासून लपवून ठेवले होते. मात्र, यामागे कारण आदिल असल्याचे म्हटले जात आहे. आपल्या लग्नाची घोषणा केल्यानंतर आदिल नाराज झाल्याचे राखीने म्हटले आहे. आदिलमुळेच लग्नाची बातमी सार्वजनिकरीत्या सांगितली नव्हती, असे राखी एक मुलाखतीत म्हणाली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
राखीचे म्हणणे आहे की, आदिल आणि तिचे लग्न सात महिन्यांपूर्वीच झाले आहे. हे लग्न गुप्त ठेवण्यासाठी आदिलने तिच्यावर दबाव टाकला होता. राखीने असेही सांगितले की, तिने निकाहसोबतच कोर्ट मॅरेजही केले होते, पण ही गोष्ट तिने आतापर्यंत सर्वांपासून लपवून ठेवली होती. तर, आता आदिल तिच्याशी बोलतही नसल्याचे राखी सावंतने म्हटले आहे. मुलाखतीदरम्यान राखी सावंत म्हणाली की, 'आता त्याला लव्ह जिहादची भीती सतावत आहे, कारण आदिलचे कुटुंब त्याच्यावर खूप दबाव आणत आहेत, त्यामुळे आदिल माझ्याशी बोलतही नाहीये'.
आदिल लग्नाची जाहीर घोषणा करण्यास का नकार देत आहे, हेच कळत नसल्याचे राखी म्हणाली. राखीने अतिशय खाजगीरित्या निकाह केला. यानंतर तिने आपले नावही बदलले. इतकं करूनही आदिल जाहीरपणे लग्नाबद्दल बोलू इच्छित नाही. राखीने म्हणाली की, ती याच गोष्टींमुळे खूप घाबरली होती, त्यामुळे आता तिने स्वतः तिच्या लग्नाचे सत्य सर्वांना सांगितले आहे. आदिलने तिच्याशी झालेले लग्न जाहीर करण्यास नकार दिल्यानंतर राखी दु:खी झाली आहे.
सोशल मीडियावर लग्नाचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता स्वतः राखी सावंतने देखील हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. राखीने स्वतः आपण लग्न केल्याची कबुली दिली होती. ‘मला खूप आनंद होतोय की, माझ्या प्रिय व्यक्तीशी लग्न करते. मी खूप उत्साहित आहे’, असे म्हणत तिने काही फोटो शेअर केले. तर, ‘लग्नाच्या सात महिन्यानंतर या आनंदाच्या क्षणाची घोषणा करताना मला देखील खूप छान वाटत आहे’, असे राखी म्हणाली.