मराठी बातम्या  /  धर्म  /  Jaya Ekadashi 2023 : वाचा जया एकदशीची सुफल कहाणी, भगवान विष्णूंचं करा स्मरण

Jaya Ekadashi 2023 : वाचा जया एकदशीची सुफल कहाणी, भगवान विष्णूंचं करा स्मरण

Feb 01, 2023, 06:31 AM IST

  • Jaya Ekadashi Katha : भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फल मिळतं असंही सांगितलं जातं. आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्व सांगणारी व्रतकथा पाहाणार आहोत.

जया एकादशीची कथा (हिंदुस्तान टाइम्स)

Jaya Ekadashi Katha : भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फल मिळतं असंही सांगितलं जातं. आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्व सांगणारी व्रतकथा पाहाणार आहोत.

  • Jaya Ekadashi Katha : भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फल मिळतं असंही सांगितलं जातं. आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्व सांगणारी व्रतकथा पाहाणार आहोत.

Jaya Ekadashi 2023

ट्रेंडिंग न्यूज

Chardham Yatra 2024 : चारधाममध्ये कोणत्या देवी-देवतांची पूजा केली जाते? जाणून घ्या

Shani Jayanti 2024 : शनि जयंतीला करा हे उपाय, सर्व अडचणी दूर होतील

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही या वस्तू खरेदी करू नका, नाहीतर आयुष्यभर घरात दारिद्र्य राहील

Ganga Saptami 2024 : यंदा गंगा सप्तमी कधी साजरी केली जाईल? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि महत्त्व

जया एकादशी फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच १ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी केली जात आहे. आज जया एकादशीनिमित्त उपवास केला आणि जया एकादशीची व्रतकथा ऐकली तर पुण्य प्राप्त होतं असं सांगितलं गेलं आहे. जया एकादशीनिमित्त फक्त फलाहार करावा आणि भगवान विष्णूचं नामस्मरण करावं असं धर्मशास्त्रात सांगण्यात आलं आहे. भगवान विष्णू प्रसन्न झाल्यास इच्छित फल मिळतं असंही सांगितलं जातं. आज आपण जया एकादशीच्या निमित्तानं या एकादशीचं महत्व सांगणारी व्रतकथा पाहाणार आहोत.

एकदा नंदन वनामध्ये उत्सव होत होता. या उत्सवात देव,गंधर्व आणि दिव्य पुरुष आमंत्रित होते. एकीकडे गंधर्व गायन करत होते तर दुसरीकडे गंधर्व कन्या नृत्य करत होत्या. अचानक तिथं गंधर्व मल्यवान आणि पुष्यवती नाचू लागले. दोघेही एकमेकांवर मोहित झाले आणि त्यांनी सभ्यतेच्या सर्व मर्यादा सोडत नृत्य केलं.

हे पाहून देवराज इंद्र रागावला. त्याने त्या दोघांना स्वर्गापासून वंचित होऊन पृथ्वीवर राहण्याचा शाप दिला. मल्यवान आणि पुष्यवती यांना मृत्यूलोकात पिशाच्च योनी मिळाली. दोघेही हिमालयावरील झाडावर राहू लागले, त्यांचे जीवन दुःखांनी भरलेले होते. माघ महिन्याच्या एकादशीच्या दिवशी दोघेही खूप दुःखी होते, त्या दिवशी दोघांनी फक्त फळं खाल्ली. त्या रात्री खूप थंडी होती त्यामुळे दोघांनी रात्रभर जागरण केले. मात्र कडाक्याच्या थंडीने त्यांचा जीव घेतला आणि दोघेही मृत्यूमुखी पडले. नकळत मल्ल्यावान आणि पुष्यवती यांच्या हातून जया एकादशीचे व्रत केले गेले. दोघांनाही भगवान विष्णूने वरदान दिले आणि दोघांना पिशाच योनीतून मुक्ती मिळाली. व्रताच्या प्रभावामुळे मल्ल्यावान आणि पुष्यवती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर होऊन स्वर्गात पोहोचले.

त्या दोघांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. त्याने विचारले की तुम्हा दोघांची पिशाच्च योनीतून सुटका कशी झाली? त्यावर मल्यवानाने त्यांना जया एकादशीचे महत्त्व सांगितले. यामुळे त्याला पिशाच्च योनीतून मुक्ती मिळाली. हे ऐकून इंद्र प्रसन्न झाले आणि भगवान विष्णूचा आदेश मानून त्याने मल्यवान आणि पुष्यवती यांना स्वर्गात राहण्याची परवानगी दिली.

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा