मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू

गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू

Nov 25, 2022, 10:15 AM IST

    • गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला.
गर्भवती महिलेनं सावत्र मुलांना जेवणातून दिलं विष, तिघांपैकी एकाचा मृत्यू

गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला.

    • गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला.

सावत्र आईने तीन लहान मुलांना विष खायला घालून हत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. गर्भवती असलेल्या महिलेनं तिच्या सावत्र मुलांना जेवणातून विष खायला घातलं. जेवल्यानंतर मुलांची प्रकृती बिघडली. तिघांपैकी एकाचा यामध्ये मृत्यू झाला. ही घटना झारखंडमधील गिरिडाह इथल्या रोहनटांडमध्ये घडली.

ट्रेंडिंग न्यूज

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

IITमध्ये शिकणाऱ्या ११५ विद्यार्थ्यांनी केली आत्महत्या; २० वर्षातली धक्कादायक आकडेवारी जाहीर

पाकिस्तान आर्मीचे हेलिकॉप्टर वाळवत आहेत गव्हाची शेतं, पंतप्रधान शहबाज यांची उडवली जातेय खिल्ली, VIDEO

रोहनटांड गावातील सुनील सोरेन यांची पहिली पत्नी शैलीन मरांडी यांचा मृत्यू दोन वर्षांपूर्वी सर्पदंशाने झाला होता. त्यांना एक मुलगी आणि ४ मुले होती. पहिल्या पत्नीच्या निधनानंतर सुनील सोरेन यांनी सुनीता हांसदा हिच्याशी लग्न केलं होतं. सुनीता आता गर्भवती असून लग्नानंतर सुनीलसोबत ती रोहनटांडमधील घरी राहते.

दुर्गापुजेआधी सुननीता हांसदा सर्व मुलांना आजी आजोबांकडे सोडून आपल्या पतीसोबत माहेरी गेली होती. तिथून सुनील कामासाठी बेंगळुरूला गेला. दरम्यान, बुधवारी सुनीता एकटीच रोहनटांड इथं आली. तेव्हा सोबत तिने विष आणि चिकन आणलं होतं. दोन दिवसांपासून आजी आजोबा घरी नसल्याचा फायदा उठवत सुनीताने भात आणि चिकन केले.

सावत्र मुलांना सुनिताने जेवणात विष कालवून स्वत: हाताने घास भरवला. तर जेवणाची चव चांगली नसल्याने एकाने खाल्लं नाही. तिघांपैकी दोघांची तब्येत बिघडायला लागली. तेव्हा तिने दोघांनाही आजी आजोबांच्या घरी झोपवलं आणि तिथून फरार झाली.

विभाग