मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Thane Water Supply : ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद!

Thane Water Supply : ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा; शहरातील पाणीपुरवठा ‘या’ दिवशी राहणार बंद!

Mar 13, 2023, 03:44 PM IST

    • Thane Water Supply News : पालिकेच्या वतीनं शहरातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळं ठाण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.
Thane Water Supply News (HT)

Thane Water Supply News : पालिकेच्या वतीनं शहरातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळं ठाण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

    • Thane Water Supply News : पालिकेच्या वतीनं शहरातील जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आल्यामुळं ठाण्यातील पाणीपुरवठा विस्कळीत होणार आहे.

Thane Water Supply News : राज्यातील प्रमुख शहरं असलेल्या मुंबई आणि पुण्यानंतर आता ठाण्यातही नागरिकांसमोर पाणी टंचाईचं मोठं संकट उभं राहिलं आहे. कारण आता ठाणे महापालिकेकडून जलवाहिनी स्थलांतरीत करण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यानंतर शहरातील अनेक भागांमध्ये उद्यापासून पाणीपुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. बुधवारी पालिकेकडून जलवाहिनीचं स्थलांतर करण्याचं काम सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळं उद्या संध्याकाळपासून ठाण्याच्या अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता ठाणेकरांना पुढील तीन दिवस पाणी जपून वापरावं लागणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Yavatmal Accident: यवतमाळमध्ये ट्रक आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक, दोघांचा जागीच मृत्यू, ७० शेळ्या दगावल्या

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरातील माजीवाडा येथील नॅशनल हायवेलगत असलेल्या जलवाहिनीचं इतर ठिकाणी स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठी पालिकेकडून बुधवारी काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळं बुधवारी सकाळी ९ वाजेपासून गुरुवारी सकाळी ९ वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांमधील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती ठाणे महापालिकेतील पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. गुरुवारी दुपारनंतर कमी दाबानं शहरात पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल. त्यामुळं आता मुंबई आणि पुण्यानंतर ठाण्यातील नागरिकांनाही पाणीबाणीचा सामना करावा लागणार आहे.

कोणत्या भागांमधील पाणीपुरवठा राहणार बंद?

जलवाहिनीच्या स्थलांतराचं काम हाती घेण्यात आल्यानंतर ठाण्यातील इंदिरानगर, लोकमान्यनगर, श्रीनगर, रामनगर, इटर्निटी, जॉन्सन, साकेत, माजीवाडा, घोडबंदर रोड, पातलीपाडा, गांधीनगर, सिद्धांचल, ऋतुपार्क, जेलटाकी, सिद्धेश्वर, समतानगर, रुस्तमजी वसाहत परिसरासह कळवा-मुंब्रा शहरातील काही भागांमधील पाणीपुरवठा २४ तासांसाठी बंद राहणार आहे. त्यामुळं आता पुढील काही दिवसांसाठी पाण्याचा आवश्यक साठा करून पालिकेस सहकार्य करण्याचं आवाहन अधिकाऱ्यांनी केलं आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा