मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Weather Forecast : राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता, २९ जानेवारीनंतर थंडीचीही लाट

Weather Forecast : राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता, २९ जानेवारीनंतर थंडीचीही लाट

Jan 27, 2023, 01:25 PM IST

  • Maharashtra weather Update : महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून कधी पावसाळा तर कधी थंडीचा कडाका वाढत आहेत. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

राज्यात पुढील २-३ दिवस पावसाची शक्यता

MaharashtraweatherUpdate : महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून कधी पावसाळा तर कधी थंडीचा कडाका वाढत आहेत. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

  • Maharashtra weather Update : महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून कधी पावसाळा तर कधी थंडीचा कडाका वाढत आहेत. अशातच आता पुढील दोन ते तीन दिवस पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रातील वातावरणात बदल झाला असून अनेक जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या आहेत. गुरुवारी सांगली, बुलडाणा व सातारा जिल्ह्यात पावसाच्या सरी कोसळल्या. राज्यात कधी थंडीचा जोर तर कधी पावसाळी वातावरण निर्माण होत आहे. सध्या राज्यात थंडीचा कडाका वाढला असून आता पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाऊस बरसणार आहे. यामुळे फळपिकांसह रब्बी पिकांना याचा फटका बसणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर बुलढाण्याजवळ भीषण अपघात, तिघे ठार, दोघे जखमी

Ahmednagar accident : अहमदनगरमध्ये ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी-कारचा भीषण अपघात; ४ ठार, ३ जखमी

Pune vishrantwadi murder : भांडणे सोडवायला गेला अन् जीव गमावून बसला! पुण्यातील विश्रांतवाडी येथील घटना

Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात पुढील ३ दिवस पावसाचे! ठाणे रायगडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा

ईशान्येकडील वाऱ्यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. गुरुवारही राज्यात काही ठिकाणी पाऊस झाला.

पावसाच्या सरी बरसण्याबरोबरच २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीचा कडाका आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्यामुळे २९ जानेवारीनंतर राज्यात थंडीची लाट येणार आहे. २ फेब्रुवारीपर्यंत राज्यात थंडीची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईसह अनेक शहरातील कमाल तापमानात घट होऊ शकते. 

हवामान बदलामुळे राज्यात कधी थंडी तर कधी पाऊस पडत असल्याने त्याचा फटका  आहे. या  हवामानाचा रब्बी हंगामाच्या पिकांवर परिणाम होत आहे.

 

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा