मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Aaditya Thackeray: “हा दिलासा किंवा धक्काही नाही, केवळ..”, SC निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Aaditya Thackeray: “हा दिलासा किंवा धक्काही नाही, केवळ..”, SC निकालानंतर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

Sep 27, 2022, 07:56 PM IST

    • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल,असं आदित्य ठाकरे म्हणाले.

    • सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर  शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

मुंबई-महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी (supreme court decision) झाली. या सुनावणीवेळी शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. शिवसेना (Shivsena) पक्ष कोणाचा? धनुष्यबाणावर कोणाचा हक्क यावर शिंदे विरुद्ध ठाकरे अशी न्यायालयीन लढाई आता निवडणूक आयोगाच्या दारात गेली आहे. त्याचबरोबर निवडणूक आयोगही निर्णय घेण्यास मोकळा झाला आहे. या प्रकरणाची सुनावणी होईपर्यंत निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीला स्थगिती द्यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून कोर्टात मांडण्यात आली, पण ठाकरे गटाची ही मागणी कोर्टाने फेटाळून लावली.

ट्रेंडिंग न्यूज

Nagpur: ब्रेकअप झाल्यानं प्रियकर संतापला, प्रेयसी काम करत असलेले दुकानच पेटवून दिलं; नागपूर येथील घटना

Maharashtra Legislative Council Elections: विधान परिषदेच्या शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी १० जूनला मतदान; 'या' दिवशी निकाल

Mumbai: मुंबईत निवडणूक ड्युटीवर तैनात पोलीस हवालदाराचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

boy died in leopard attack : मामाच्या गावी आलेल्या ८ वर्षीय मुलासोबत अघटित घडलं! बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू

सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय शिंदे गटाला दिलासा असल्याचे मानले जात आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयानंतर शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठीही आम्ही तयार आहोत. लोकशाही आणि संविधानासाठी हा लढा महत्त्वाचा ठरेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा  धक्का नाही तसेच दिलासाही नाही, फक्त युक्तीवादाचं कोर्ट बदललं आहे. सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाकडे हे प्रकरण गेलं आहे. आमचा लोकशाही, संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. आम्ही सत्याच्या बाजूने आहोत, आम्ही सत्यासाठी लढत राहणार, असे वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.