ऑरेंज कॅपमच्या शर्यतीत विराट कोहली अजूनही अव्वल आहे. मात्र या यादीत संजू सॅमसनने तिसरे स्थान पटकावले आहे. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे.
विराट कोहली- विराट कोहलीने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ४ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. विराटच्या नावावर ११ सामन्यात ५४२ धावा आहेत.
ऋतुराज गायकवाड- ऋतुराज गायकवाडनेही आतापर्यंत ११ सामन्यात ४ अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. ऋतुराजच्या नावावर ११ सामन्यात ५४१ धावा आहेत.
संजू सॅमसन- संजू सॅमसननेही ११ सामन्यात आतापर्यंत ५ अर्धशतके झळकावली आहेत. त्याला यंदा एकही शतक करता आलेले नाही. संजूच्या नावावर ११ सामन्यात ४७१ धावा आहेत.
पर्पल कॅपसाठीही खडतर स्पर्धा- पर्पल कॅपच्या शर्यतीत मुंबईचा जसप्रीत बुमराह आघाडीवर आहे. त्याने १२ सामन्यात १८ विकेट घेतल्या आहेत. यानंतर दुसऱ्या नंबरवर पंजाबचा हर्षल पटेल आहे. त्याने ११ सामन्यात १७ विकेट घेतल्या आहेत.
तिसऱ्या नंबरवर केकेआरचा वरुण चक्रवर्ती आहे. त्याने ११ सामन्यात १६ विकेट घेतल्या आहेत. यानंतर हैदराबादचा टी नटराजन ९ सामन्यात १५ विकेट्ससह चौथ्या नंबरवर आहे. पंजाबचा अर्शदीप ११ सामन्यात १५ विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
संजू सॅमसन सर्वात जलद २०० षटकार भारतीय - संजू सॅमसनने IPL २०२४ च्या ५६ व्या सामन्यातून इतिहास रचला आहे. तो सर्वात जलद २०० षटकार मारणारा भारतीय ठरला आहे. संजू सॅमसनने १५९ डावात ३०८१ चेंडू खेळून ही कामगिरी केली. संजू सॅमसनच्या आधी एमएस धोनी या यादीत होता. धोनीने १६५ डावांमध्ये ३१२६ चेंडू खेळून २०० षटकार ठोकले आहेत.