Rang Maza Vegla: अखेर दीपा कार्तिकला शिकवणार धडा; ‘रंग माझा वेगळा’मध्ये येणार ट्विस्ट!
May 09, 2023, 01:02 PM IST
Rang Maza Vegla Latest Episode: कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode: कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode: कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे.
Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. इतके दिवस कार्तिक दीपाशी खोटं वागत होता, हे सत्य आता तिला कळलं आहे. आपण वेडे झालो नसून, हा कार्तिकचा प्लॅन असल्याचेही तिच्या लक्षात आले आहे. कार्तिकचा डाव लक्षात आल्यानंतर आता दीपा त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देताना दिसणार आहे. दीपा कार्तिकचा खेळ आता त्याच्यावरच उलटवणार आहे. दीपावर आपलं किती प्रेम आहे, हे दाखवण्यासाठी कार्तिक तिला बाहेर फिअरायला घेऊन जाणार आहे. मात्र, दीपा त्याचा खेळ आधीच ओळखून आहे.
कार्तिक ज्या तुरुंगात १४ वर्षांची शिक्षा भोगून आला, त्याच तुरुंगात दीपा देखील जाऊन आली. यावेळी त्या कोठडीतील दृश्य बघून दीपाच्या पायाखालची जमीन सरकली. या कोठडीच्या भिंतीवर कार्तिकने दीपाचं नाव लिहून त्यावर फुल्या मारल्या होत्या. याचाचा अर्थ कार्तिक दीपाचा प्रचंड तिरस्कार करत आहे. मात्र, तो सगळ्यांसमोर चांगलं वागण्याचं नाटक करत आहे. हे आता दीपाच्या समोर उघड झालं आहे. यानंतर आता दीपाने कार्तिकला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
Salman Khan: सलमानला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी जारी केली लुकआउट नोटीस!
कार्तिक तुरुंगातून आल्यापासून त्याच्या स्वभावात झालेला बदल दीपाने बरोबर ओळखला होता. तिने वेळोवेळी हा बदल सगळ्यांच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्नही केला. मात्र, कार्तिक १४ वर्ष तुरुंगात होता, त्यामुळे कदाचित त्याला या वातावरणाची सवय राहिली नसेल. त्याला थोडा वेळ देऊया, असं सगळेच म्हणत होते. मात्र, दीपा नेहमीच कार्तिकपासून सावध राहण्याचा प्रयत्न करत आहे. याचाच फायदा घेऊन आता कार्तिक दीपा विरोधात नवा डाव रचत आहे. आता दीपा संधी साधून कार्तिकचा खेळ त्याच्यावरच उलटवणार आहे.
कार्तिक दीपाला एका मालिकेचा भाग दाखवत असताना, त्यात नायकाच्या चुकीमुळे नायिकेचा जीव जातो. त्यावेळी कार्तिक म्हणतो की, या बायका कशा असतात, पुरुषावर इतका विश्वास ठेवतात आणि जीव गमवतात. यावर दीपा म्हणते की, मी तिच्या जागी असते, तर नवऱ्याचा हात पकडून त्याला देखील स्वतःबरोबर दरीत घेऊन गेले असते. दीपाचे हे बोलणे ऐकून आता कार्तिकला धक्का बसणार आहे.