मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: अखेर आयेशा देशमुख अन् दीपाची भेट होणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर

Rang Maza Vegla: अखेर आयेशा देशमुख अन् दीपाची भेट होणार! ‘रंग माझा वेगळा’ मालिका रंजक वळणावर

Jun 06, 2023, 02:54 PM IST

  • Rang Maza Vegla Latest Episode: कार्तिकी आई दीपाला आणि बहीण दीपिकाला सोबत घेऊन आर्यनच्या घरी जाणार आहे. त्यामुळे आता आयेशा आणि दीपा अखेर समोरासमोर येणार आहेत.

Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Episode: कार्तिकी आई दीपाला आणि बहीण दीपिकाला सोबत घेऊन आर्यनच्या घरी जाणार आहे. त्यामुळे आता आयेशा आणि दीपा अखेर समोरासमोर येणार आहेत.

  • Rang Maza Vegla Latest Episode: कार्तिकी आई दीपाला आणि बहीण दीपिकाला सोबत घेऊन आर्यनच्या घरी जाणार आहे. त्यामुळे आता आयेशा आणि दीपा अखेर समोरासमोर येणार आहेत.

Rang Maza Vegla Latest Episode:रंग माझा वेगळा’ या मालिकेत पुन्हा एकदा व्हिलन ट्रॅक पाहायला मिळणार आहे. एक-दोन नव्हे तर आता या मालिकेत एकाच वेळी चार व्हिलन पाहायला मिळत आहेत. एकीकडे कार्तिक आणि श्वेता मिळून दीपाला त्रास देत आहेत. तर, दुसरीकडे आर्यन आणि आयेशा आता दीपाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आयेशा परतून आल्यामुळे आता मालिका रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेत आर्यनची एन्ट्री झाल्याने नक्कीच काहीतरी मोठं घडणार याचा अंदाज प्रेक्षकांना होताच. आर्यन दीपाच्या दोन्ही मुलींची फसवणूक करत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

‘सोढी’ हरवलाय! आता ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या कलाकारांची दिल्ली पोलिसांकडून चौकशी होणार

सप्तसूर आणि गाणी रंगणार; आर्या आंबेकर, मामे खान आणि पूरबियान चॅटर्जी यांची मुंबईत मैफल भरणार!

‘हीरामंडी’साठी २०० कोटी, तर ‘पंचायत ३’साठी ८० कोटी; ‘या’ लोकप्रिय वेब सीरिज्सच्या निर्मितीचं बजेट माहितीय?

डोळे सुजले, चेहराही झालाय लाल! प्रियांका चोप्राच्या नवऱ्याला झालं तरी काय? निक जोनासचा Video Viral

१४ वर्षांपूर्वी आयेशामुळेचा कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात अनेक विघ्न आली होती. तर, आयेशामुळेच दीपा आणि कार्तिकचा संसार देखील मोडला होता. आता १४ वर्षांच्या मोठ्या लीपनंतर देखील आता आयेशा पुन्हा एकदा कार्तिकला मिळवण्याच्या उद्देशाने परत आली आहे. आयेशाच्या बहिणीचा मुलगा आर्यन हा एकाचवेळी दीपिका आणि कार्तिकी दोघांना फसवत आहे. यामागे त्याचा काहीतरी मोठा डाव आहे. आपल्या मावशीला दिलेला त्रास इनामदार कुटुंबाला देखील व्हावा म्हणून तो हा डाव खेळत आहे.

Bal Shivaji : लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो! रवी जाधव यांच्या 'बाल शिवाजी'चे पोस्टर प्रदर्शित

आर्यन हा आयेशाच्या बहिणीचा मुलगा असून, तो इनामदार कुटुंबावर सूड उगवण्यासाठी आला आहे. मात्र, तो आयेशाला कार्तिक आणि दीपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तिला होणारा त्रास कमी होईल, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता आयेशा आणि दीपाची भेट होणार आहे. दोघी एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने आता त्यांची भेट होणारच आहे. कार्तिकी आपल्या आईला म्हणजेच दीपाला आणि दीपिकाला सोबत घेऊन आर्यनच्या घरी जाणार आहे. या भेटीमुळे मात्र दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा वादळ येणार आहे.

आता आयेशा आणि दीपा एकमेकींसमोर येणार का? आणि या दोघी एकत्र आल्याच तर मालिकेत पुढे काय घडणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.‘रंग माझा वेगळा’या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. दिपामुळे आपल्याला शिक्षा झाली, असा गैरसमज झालेला कार्तिक तिच्यावर सूड उगवत आहे. मात्र, याची कल्पना असून देखील दीपा कार्तिकला पुन्हा एकदा त्याचे आयुष्य पूर्वपदावर आणण्यासाठी मदत करताना दिसणार आहे. मालिकेच्या येत्या भागांमध्ये हे कथानक पाहायला मिळणार आहे.