मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Akola Murder : अकोला हादरले! लग्नाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करून पतीने केली हत्या

Akola Murder : अकोला हादरले! लग्नाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करून पतीने केली हत्या

Ninad Vijayrao Deshmukh HT Marathi
Apr 24, 2024 04:07 PM IST

Akola Murder : अकोला येथे कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची आणि मुलीची कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

लग्नाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करून पतीने केली हत्या
लग्नाच्या निमित्ताने अकोल्यात आलेल्या पत्नी व मुलीची कुऱ्हाडीने वार करून पतीने केली हत्या

Akola crime news: अकोला येथे आज सकाळी एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. कौटुंबिक वादातून मुलीसह माहेरी गेलेल्या पत्नीची आणि मुलीची पतीने कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना आकोल्यातील हनुमानवस्ती परिसरात आज बुधवारी सकाळी घडली. गेल्या १० दिवसांत दुहेरी हत्याकांडाची घडलेली ही दुसरी घटना आहे.

Viral News : डीजेवर नाचण्यावरून लग्नात गोंधळ! स्टेजवर बसलेल्या वधू-वरांसमोर लाथा-बुक्क्यांनी फ्री स्टाईल हाणामारी

मनीष म्हात्रे असे आरोपी पतीचे नाव आहे. तर रश्मि म्हात्रे असे खून केलेल्या पत्नीचे नाव आहे. ९ वर्षीय खून केलेल्या मुलीचे नाव समजू शकले नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनिष म्हात्रे व पत्नी रश्मि हे दोघे सोबत राहत होते. मात्र, त्यांच्यात सतत वाद होत असल्याने रश्मी ही टीच्या मुलीसह तिच्या माहेरी नांदेड येथे निघून गेली होती. ती गेल्या पाच वर्षांपासून मुलीसह माहेरी नांदेड येथे राहत होती. मात्र, म्हात्रे कुटुंबातील नातेवाईकांचे लग्न असल्याने रश्मी म्हात्रे या मुलीसह मंगळवारी अकोल्यात आल्या होत्या.

sachin tendulkar birthday : मैदान सोडून १० वर्षे झाली तरी करोडो रुपये कमावतोय सचिन तेंडुलकर?; किती आहे एकूण संपत्ती?

तब्बल पाच वर्षांनंतर घरी आल्याने पती मनीष आणि पत्नी रश्मिमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. हा वाद टोकाला गेल्याने रागाच्या भरात आरोपीने बुधवारी सकाळी पत्नी व मुलीवर कुऱ्हाडीने वार करून त्यांची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना याची माहिती मिळताच रामदास पेठ पोलिस घटनास्थळी आले. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. तसेच आरोपी पती मनिष म्हात्रे याला अटक करण्यात आली आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले. या प्रकरणी रामदास पेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.  गेल्या काही दिवसांपासून अकोल्यात खुनाच्या घटना वाढल्या आहेत. यमुळे अकोल्यात कायदा अनाई सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या वाढत्या गुन्हेगारीवर वचक बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. 

IPL_Entry_Point

विभाग