TRP Report: ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘ही’ मराठी मालिका ठरली अव्वल; पाहा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट!
Marathi TV Serial TRP Report: ३९व्या आठवड्याच्या टीआरपी रिपोर्टमध्ये कोणत्या मालिकांनी बाजी मारली आणि कोणत्या मालिका आपली जादू दाखवण्यात कमी पडल्या ते जाहीर करण्यात आले आहे.
Marathi TV Serial TRP Report: सध्या छोट्या पडद्यावर अनेक नव्या मालिका दाखल झाल्या आहेत. या मालिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. मात्र, काही नव्या मालिकांना मिळत असलेल्या लोकप्रियतेमुळे जुन्या मालिकांना काही अंशी फटका बसलेला दिसत आहेत. नुकताच ३९व्या आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये कोणत्या मालिकांनी बाजी मारली आणि कोणत्या मालिका आपली जादू दाखवण्यात कमी पडल्या ते जाहीर करण्यात आले आहे. चला तर पाहूया कोणत्या मालिकांना मिळतेय अधिक पसंती...
ट्रेंडिंग न्यूज
ठरलं तर मग
या आठवड्यात जुई गडकरी आणि अमित भानुशाली याची ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपी शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला धोबीपछाड देत ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिला क्रमांक मिळवला आहे. सायलीवर झालेला हल्ला, अर्जुन आणि सायलीमध्ये फुलणारं प्रेम या ट्रॅकने प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवलं आहे.
तुझेच मी गीत गात आहे
स्वरा आणि मल्हारच्या आयुष्यात आलेल्या नव्या ट्वीस्टमुळे ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही मालिका अतिशय रंजक वळणावर आली आहे. या मालिकेने टीआरपी शर्यतीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. मोनिकाने केलेल्या करामतीमुळे आता मल्हार आणि स्वरा एकमेकांपासून दुरावण्याच्या मार्गावर आले आहेत.
Mission Raniganj Review: अक्षय कुमारचा ‘मिशन रानीगंज’ पाहण्याचा विचार करताय? कसा आहे चित्रपट जाणून घ्या...
स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२३
या मालिकांना मात देण्यात एक विशेष कार्यक्रमाची भूमिका देखील महत्त्वाची ठरली आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्टार प्रवाह या वाहिनीवर गणेशोत्सव विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाने देखील मालिकांना मात देत टीआरपी यादीत स्थान मिळवले आहे.
प्रेमाची गोष्ट
अभिनेत्री तेजश्री प्रधान ‘प्रेमाची गोष्ट’ या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. तिची ही मालिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेने अवघ्या २ आठवड्यातच टीआरपी यादीत आपले स्थान निश्चित केले आहे. सध्या ही मालिका चौथ्या क्रमांकावर आहे.
सुख म्हणजे नक्की काय असतं
गौरी आणि जयदीप यांच्या आयुष्यातील संकटं काही केल्या दूर होण्याचे नाव घेत नाहीये. एका मागून एक अनेक कठीण प्रसंग त्यांच्या शिर्के-पाटील कुटुंबावर येत आहेत. एकीकडे मालिकेच्या कथानकावर टीका होत असताना देखील तिने टीआरपी यादीत टॉप ५मध्ये आपले स्थान पटकावले आहे.
विभाग