Amruta Fadnavis: उर्फी जे करतेय त्यात मला काही चुकीचं वाटत नाही; अमृता फडणवीस यांची बिनधास्त भूमिका
Urfi Javed: अमृता फडणवीस यांचे 'अज मैं मूड बणा लेया' हे गाणे प्रदर्शित झाले. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वादावर प्रतिक्रिया दिली आहे.
गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटी फेम उर्फी जावेद आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यामध्ये वाद सुरु असल्याचे दिसत आहे. चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. ते पाहून उर्फी देखील शांत बसली नाही. तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रा वाघ यांना चांगलेच सुनावले. उर्फी आणि चित्रा वाघ यांच्यामध्ये सुरु असलेल्या वादात अनेकांनी उडी घेतली. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
अमृता फडणवीस यांचे नुकताच ‘अज मैं मूड बणा लेया' हे गाणे प्रदर्शित झाले. गाणे प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांना उर्फी जावेदविषयी काही प्रश्न विचारण्यात आले होते. तेव्हा अमृता फडणवीस म्हणाल्या की, 'उर्फी जे करतेय त्यात मला काही चुकीचं वाटत नाही.'
वाचा: ऊर्फी जावेदच्या कपड्यांवरून सुरू असलेल्या वादात आता ‘या’ महिला नेत्याची उडी
पुढे अमृता फडणवीस म्हणाल्या की, 'प्रत्येकाचे विचार हे वेगळे असतात. चित्रा वाघ यांनी त्यांचे विचार मांडले आणि त्यानुसार त्यांनी कृती केली. उर्फी एक कलाकार आहे. पण जेथे तुझी कामाबाबत कोणतीही कमिटमेंट नाही तेथे आपली संस्कृती जपायला हवी. नेहमी व्यावसायिक आणि सार्वजनिक आयुष्य हे दोन्ही वेगळवेगळे ठेवायचे असते. ती एक स्त्री आहे. त्यामुळे ती जे करत आहे ते स्वत:साठीच करत आहे. त्यामध्ये मला काहीच चुकीचे वाटत नाही.'
'केवळ प्रकाशझोतात येण्यासाठी तुम्ही रस्त्यावर असे फिरत असाल तर हे ठिक नाही', असे देखील अमृता फडणवीस म्हणाल्या.