T20 World Cup 2024 : आयपीएल सुरू असतानाच टीम इंडिया अमेरिकेला जाणार, तारीख जाणून घ्या
t20 world cup 2024 : टी-20 विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व संघांनी १ मे पर्यंत आपापल्या संघांची घोषणा करायची आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा जागतिक क्रमवारीत नंबर वन टी-20 संघ टीम इंडियावर आहे.
भारतात सध्या आयपीएल २०२४ चा थरार सुरू आहे. या स्पर्धेनंतर लगेच टी-20 वर्ल्डकप खेळला जाणार आहे. यंदाची आयपीएल टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच टी-20 वर्ल्डकपसाठी संघ निवडला जाणार आहे.
ट्रेंडिंग न्यूज
दरम्यान, टी-20 विश्वचषक १ जूनपासून वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. सर्व संघांनी १ मे पर्यंत आपापल्या संघांची घोषणा करायची आहे. अशा स्थितीत सर्वांच्या नजरा जागतिक क्रमवारीत नंबर वन टी-20 संघ टीम इंडियावर आहे. भारत कोणत्या खेळाडूंसह विश्वचषकात उतरेल याकडे सर्वांचे लक्ष आहे.
आगामी टी-20 विश्वचषकासाठी भारताचा १५ सदस्यीय संघ लवकरच जाहीर केला जाऊ शकतो.
आयपीएल २६ मे रोजी संपणार आहे. अशा परिस्थितीत टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणारे खेळाडू या स्पर्धेसाठी कधी रवाना होतील यासंदर्भात एक मोठी माहिती समोर आली आहे.
टीम इंडिया T20 वर्ल्ड कपसाठी कधी रवाना होणार?
आयपीएल २०२४ दरम्यानच भारतीय खेळाडू टी-20 विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना होऊ शकतात. एका वर्तमानपत्राच्या वृत्तानुसार, भारतीय संघ २१ मे रोजी अमेरिकेला रवाना होणार आहे.
भारतीय संघ वेगवेगळ्या बॅचमध्ये अमेरिकेला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत पहिल्या तुकडीत त्या भारतीय खेळाडूंचा समावेश असेल जे आयपीएल प्लेऑफसाठी पात्र ठरू शकणार नाहीत.
टीम इंडियाचा संघ लवकरच जाहीर होणार
या स्पर्धेसाठी आयसीसीने सर्व संघांना १ मे पर्यंत संघ जाहीर करण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआय लवकरच भारतीय संघाची घोषणा करू शकते. या स्पर्धेसाठी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव या खेळाडूंचे स्थान निश्चित मानले जात आहे. त्याच वेळी, संघाचा भाग होण्यासाठी काही खेळाडूंमध्ये खडतर स्पर्धा आहे.
T20 विश्वचषक १७ वर्षांपासून जिंकलेला नाही
टीम इंडियाने गेल्या ११ वर्षांपासून एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. त्याच वेळी, भारताने शेवटचा टी-20 विश्वचषक २००७ मध्ये जिंकला होता. त्यावेळी एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अंतिम फेरीत पाकिस्तानचा पराभव करून स्पर्धा जिंकली होती. अशा स्थितीत यावेळी भारतीय खेळाडूंच्या नजरा ट्रॉफीची प्रदीर्घ प्रतीक्षा संपवण्याकडे असतील.