मराठी बातम्या  /  क्रीडा  /  Mumbai Indians: IPL ची तयारी सुरु, अर्जुनसह 'हे' नवीन खेळाडू इंग्लंडला पाठवणार

Mumbai Indians: IPL ची तयारी सुरु, अर्जुनसह 'हे' नवीन खेळाडू इंग्लंडला पाठवणार

Jun 29, 2022, 06:46 PM IST

    • मुंबई इंडियन्ससाठी (mumbai indians) आयपीएलचे १५ (IPL) वे सीझन हे अतिशय निराशाजनक राहिले होते. मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता. संपूर्ण संघाने स्पर्धेत केवळ तीनच सामने जिंकले होते.
rohit sharma

मुंबई इंडियन्ससाठी (mumbai indians) आयपीएलचे १५ (IPL) वे सीझन हे अतिशय निराशाजनक राहिले होते. मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता. संपूर्ण संघाने स्पर्धेत केवळ तीनच सामने जिंकले होते.

    • मुंबई इंडियन्ससाठी (mumbai indians) आयपीएलचे १५ (IPL) वे सीझन हे अतिशय निराशाजनक राहिले होते. मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता. संपूर्ण संघाने स्पर्धेत केवळ तीनच सामने जिंकले होते.

IPL १५ मधील खराब कामगिरीनंतर मुंबई इंडियन्सने आतापासूनच पुढच्या मोसमाची तयारी सुरू केली आहे. मुंबई इंडियन्सचे युवा खेळाडू हे तीन आठवड्यांसाठी इंग्लंडला जाणार आहेत. आधुनिक प्रशिक्षण सुविधांव्यतिरिक्त, हे  युवा खेळाडू तेथील काउंटी संघांसोबत टी-२० सामने खेळणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

या युवा खेळांडूमध्ये टिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, रमणदीप सिंग, हृतिक शोकीन यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंना तिथे तगड्या टी-२० क्लबसोबत क्रिकेट खेळण्याचा अनुभव मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. अर्जुन तेंडुलकर आणि दक्षिण आफ्रिकेतील युवा खेळाडू डिवाल्ड ब्रेव्हिस हे देखील या दौऱ्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांच्या नेतृत्वाखालील सपोर्ट स्टाफही इंग्लंडमध्ये उपस्थित राहणार आहे.

दरम्यान, मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलचे १५ वे सीझन हे अतिशय निराशाजनक राहिले. मुंबईचा संघ गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर होता. संपूर्ण संघाने स्पर्धेत केवळ तीनच सामने जिंकले होते.

या दौऱ्यासाठी संभाव्य संघः तिलक वर्मा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, मयंक मार्कंडे, राहुल बुद्धी, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, बासिल थंपी, मुरुगन अश्विन, आर्यन जुयाल, आकाश मेधवाल, अर्शद खान, अर्जुन तेंडुलकर, डिवाल्ड ब्रेविस.