Aurangabad : किरकोळ वादातून रिक्षाचालकाला भरचौकात मारहाण; धक्कादायक घटनेनं औरंगाबादेत खळबळ
Dec 05, 2022, 11:32 AM IST
- Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- Aurangabad Crime News : दुचाकीला रिक्षाची धक्का लागल्यानं भरचौकात रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Aurangabad Crime News Marathi : वाहनाला धक्का लागला म्हणून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं औरंगाबाद शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील गणपती मंदिरासमोर रिक्षाचालकाला मारहाण करण्यात आली आहे. किरकोळ वादातून रिक्षा ड्रायव्हरला मारहाण केल्याचा व्हिडिओही आरोपींनी व्हायरल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद शहरातील वरद गणपती मंदिरासमोर वाहतूक कोंडी झालेली असताना एका दुचाकीला रिक्षानं धक्का दिल्यानं दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकात वाद झाला. त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाल्यानंतर दुचाकीस्वारानं रिक्षाचालकाला मारहाण करायला सुरुवात केली. रिक्षाचालकाला रस्त्यावर लोळवून मारहाण होत असल्याचं पाहून उपस्थितांनी रिक्षाचालकाला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु तरीही तरुण रिक्षाचालकाला मारहाण करतच होता. परंतु काही लोकांनी मध्यस्ती केल्यानंतर वाद निवळला.
औरंगाबाद शहरातील या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणात अजूनही पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. परंतु रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून औरंगाबाद शहरात मारहाण आणि प्राणघातक हल्ल्याच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. काही दिवसांपूर्वीच शहरातील पडेगाव रोडवर एका तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. त्यामुळं आता शहरातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे.