मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Nitin Gadkari : आर्थिक सुधारणांसाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी, गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक

Nitin Gadkari : आर्थिक सुधारणांसाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी, गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक

Nov 08, 2022, 11:19 PM IST

    • देशाला उदार आर्थिक धोरण दिल्याबद्दल देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वाहतूक व रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 
गडकरींकडून माजी पंतप्रधानांचे कौतुक

देशाला उदार आर्थिक धोरण दिल्याबद्दल देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वाहतूक व रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

    • देशाला उदार आर्थिक धोरण दिल्याबद्दल देश माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे, असे गौरवोद्गार केंद्रीय वाहतूक व रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी काढले. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांद्वारे देशाला नवी दिशा दिल्याबद्दल रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी देश त्यांचा ऋणी असल्याचे गौरवोद्गार काढले. दिल्लीत आयोजित 'TIOL पुरस्कार २०२२' कार्यक्रमाला संबोधित करताना गडकरी म्हणाले की, तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी १९९१ साली सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांनी भारताला एक नवी दिशा दाखवली.

ट्रेंडिंग न्यूज

Viral News: पिस्तूलासोबत रील बनवताना छातीवर लागली गोळी, तरुणाचा मृत्यू

Heat Wave Alert : मे महिन्यातही सूर्य कोपणार! महाराष्ट्रासह ‘या’ राज्यात ८ दिवस उष्णतेची लाट

Vande Bharat Metro : वंदे भारत मेट्रोचा फर्स्ट लुक आला समोर, लवकरच होणार लाँच; पाहा VIDEO

IRCON Recruitment 2024: भारतीय रेल्वेत असिस्टंट मॅनेजरसह 'या' पदांसाठी भरती; पगार १ लाख ४० हजार!

'देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे'
'TaxIndiaOnline'पोर्टलने आयोजित केलेल्या कार्यक्रमात गडकरी म्हणाले की, "उदारमतवादी अर्थव्यवस्थेमुळे देशाला नवी दिशा मिळाली. त्यासाठी देश मनमोहन सिंग यांचा ऋणी आहे. ते म्हणाले की मनमोहन सिंग यांनी सुरू केलेल्या आर्थिक सुधारणांमुळे ते महाराष्ट्राचे मंत्री असताना या रस्ते प्रकल्पांसाठी निधी उभारू शकले.

'देशाला उदार आर्थिक धोरणाची गरज -
गडकरींनी भारतातील गरीबांनाही फायदा व्हावा, या उद्देशाने उदार आर्थिक धोरणाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. ते म्हणाले की, उदारमतवादी आर्थिक धोरण शेतकरी आणि गरीबांसाठी आहे. उदारमतवादी आर्थिक धोरणाद्वारे देशाचा विकास करण्यासाठी चीनचे उत्तम उदाहरण आहे.  भारताच्या संदर्भात गडकरी म्हणाले की, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी देशाला अधिक भांडवली गुंतवणुकीची आवश्यकता असेल.

देशभरात २६ द्रुतगती मार्ग बांधण्यात येत असल्याचा उल्लेख करून ते म्हणाले की, या एक्स्प्रेस वेमध्ये मला पैशांची कमतरता भासली नाही. ते म्हणाले की भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) महामार्गांच्या बांधकामासाठी सर्वसामान्यांकडून पैसे गोळा करत आहे.गडकरींच्या मते, एनएचएआयचा टोल महसूल सध्याच्या ४०,००० कोटी रुपयांवरून २०२४ च्या अखेरीस १.४० लाख कोटी रुपयांपर्यंत वाढेल.

 

विभाग