मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  अग्निपथला विरोध, केंद्राचे एक पाऊल मागे; संरक्षण मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

अग्निपथला विरोध, केंद्राचे एक पाऊल मागे; संरक्षण मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय

Jun 17, 2022, 08:41 AM IST

    • गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

    • गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे.

केंद्र सरकारने देशभरातून अग्निपथ योजनेला (Agneepath Scheme) होत असलेल्या विरोधानंतर एक पाऊल मागे घेतलं आहे. लष्कर भरतीसाठी (Indian Amry) आता वयोमर्यादा २१ वरून २३ करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा फक्त एकदाच लागू असणार आहे. सरकारने सांगितलं की, "गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही भरती झालेली नाही त्यामुळे हा निर्णय घेतला आहे." लष्करात भरतीसाठी केंद्र सरकारने अग्निपथ योजना आणली पण त्याला बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यातील उमेदवार रस्त्यावर उतरून विरोध करत आहेत. अनेक ठिकाणी रेल्वेला आग लावण्याच्या घटनाही घडल्या.

ट्रेंडिंग न्यूज

Covaxin : कोवॅक्सिन लस किती सुरक्षित? कोविशील्डचा वाद सुरू असताना भारत बायोटेकनं दिली महत्त्वाची माहिती; वाचा

Google Chrome : गुगल क्रोम वापरत असाल तर तातडीनं करा 'हे' काम, नाहीतर रस्त्यावर याल!

NEET UG Hall Ticket 2024: नीट यूजी परीक्षा प्रवेशपत्र जारी; ‘या’ लिंकवरून करा डाउनलोड, जाणून घ्या परीक्षेची तारीख

Viral VIDEO : बाप की हैवान? मुलाचा घेतला जीव, वजन जास्त असल्यानं जीममध्ये नेऊन ट्रेडमशिनवर पळवलं अन्…

सरकारने गुरुवारी रात्री अग्निपथ योजनेमध्ये बदलाची घोषणा केली. सुरुवातीला सरकारने या योजनेंतर्गत १७.५ ते २१ या वयोगटातील उमेदवारांना भरती होता येत होते. आता २३ वर्षापर्यंत उमेदवारांना यात सहभागी होता येईल. मात्र वयोमर्यादेत ही वाढ फक्त एका भरतीसाठी करण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा वयोमर्यादा २१ वर्षेच राहणार आहे.

अग्निपथ योजनेविरोधात अनेक राज्यात आंदोलन होत आहे. सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटलं की, नव्या मॉडेलमुळे फक्त सशस्त्र बलांमध्येच नवी क्षमता निर्माण होईल असं नाही तर तरुणांना खासगी क्षेत्रातील मार्गही तयार होतील. तसंच सेवा निधी पॅकेजमुळे व्यावसायिक क्षेत्रात उतरण्यासाठीही मदत होईल. सरकारने दिलेल्या या स्पष्टीकरणानंतरही अनेक राज्यातील विरोध कायम आहे.

गुरुवारी बिहारमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. रेल्वे स्टेशनवर रेल्वेच्या डब्यांना आग लावण्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. बिहारचे अप्पर पोलिस महासंचालक संजय सिंह म्हणाले की, आतापर्यंत आम्ही या प्रकरणी १२५ जणांना अटक केली आहे. २० हून अधिक गुन्हे दाखल झाले असून आंदोलनात झालेल्या झटापटीत किमान १६ पोलिस कर्मचारी जखमी झाले आहे.