मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  यातच हिंदुस्थानचे हित; PFIवरून केंद्रातील अन् राज्यातील गृहमंत्र्यांना राज ठाकरेंचे पत्र

यातच हिंदुस्थानचे हित; PFIवरून केंद्रातील अन् राज्यातील गृहमंत्र्यांना राज ठाकरेंचे पत्र

Sep 24, 2022, 05:44 PM IST

    • Raj Thackeray On PFI protest:  हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे (फोटो - हिंदुस्तान टाइम्स)

Raj Thackeray On PFI protest: हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

    • Raj Thackeray On PFI protest:  हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

Raj Thackeray On PFI protest: देशभरात एनआयए आणि ईडीने पीएफआयच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर टाकलेल्या छाप्यानंतर पीएफआयकडून निदर्शने केली गेली. यावेळी पुण्यात पीएफआय संघटनेच्या कार्यकर्त्यांनी देशविरोधी घोषणाबाजी केल्यानं आता वातावरण तापलं आहे. यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही संताप व्यक्त केला असून ही कीड समूळ नष्ट करा, सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे असं म्हटलं आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Salman Khan Firing Case : गोळीबार प्रकरणाला वेगळं वळण! आरोपीचा पोस्टमार्टम रिपोर्ट आला समोर, सलमान खान अडचणीत!

Buldhana Bus Accident : बुलढण्यात एसटी व खासगी बसचा भीषण अपघात; एक महिला ठार, २५ प्रवासी जखमी

IMD High wave alert : सावधान! येत्या ३६ तासांत समुद्रात जास्त उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता

Mumbai Crime : कॉन्स्टेबल विशाल पवारच्या मृत्यू प्रकरणाला नवे वळण, विषारी इंजेक्शन कथेचा बनाव? सीसीटीव्ही फुटेज मिळाले

राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर एक पत्रक प्रसिद्ध केलं आहे. यात त्यांनी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती केलीय. राज ठाकरेंनी म्हटलं की, ‘पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर’ अशा घोषणा हिंदुस्थानात दिल्या जाणार असतील तर... आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. त्यापेक्षा ही कीड समूळ नष्टच करा, ह्यातच हिंदुस्थानाचं हित आहे.

एनआयएने छापे घातले आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) च्या पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना अटक केली, म्हणून पुण्यात ह्या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, 'पाकिस्तान झिंदाबाद, अल्लाहू अकबर' अशा घोषणा दिल्या. सरकारने ह्यांना वेळीच ठेचलं पाहिजे अशी मागणीही राज ठाकरे यांनी केली आहे.

पीएफआयच्या पदाधिकाऱ्यांवर झालेली अटकेची कारवाई ही कशासाठी झाली? तर दहशतवाद्यांना आर्थिक मदत करणे, त्यांची प्रशिक्षण शिबिरं आयोजित करणे, ह्या गंभीर आरोपांखाली ... थोडक्यात देशद्रोही कृत्यांसाठी. तरीही ह्या देशद्रोह्यांचं समर्थन करत जर ह्या PFI च्या कार्यकर्त्यांना त्यांचा धर्म आणि पाकिस्तान आठवत असेल, तर तुमचा धर्म घ्या आणि पाकिस्तानात चालते व्हा. ही थेरं आमच्या देशांत चालणार नाहीत असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला आहे.

माझी केंद्रातील आणि राज्यातील गृहमंत्र्यांना विनंती आहे की फक्त ह्या देशद्रोह्यांनाच नव्हे तर त्यांच्या ह्या समर्थकांना पण अशी अद्दल घडवा की यापुढे पाण्यासाठी देखील (पा) उच्चारता येणार नाही. नाहीतर आता ह्या देशातील हिंदू बांधव गप्प बसणार नाहीत. हिंदुस्थानातील हिंदूंच्या आणि महाराष्ट्रातील हिंदू मरहट्ट्यांच्या मुठी जर आवळल्या तर ह्या हरामखोरांना कुठे पाय लावून पळायला लागेल हे मला सांगायला लावू नका. ह्या सगळ्याने उगाचच सणासुदीच्या काळात अशांतता पसरेल अशा शब्दात इशारा दिला आहे.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा