मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  अबब! एकाच चित्रपटात पाहायला मिळणार ५० कलाकारांची फौज

अबब! एकाच चित्रपटात पाहायला मिळणार ५० कलाकारांची फौज

Aarti Vilas Borade HT Marathi

Sep 15, 2022, 11:15 AM IST

    • प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट खळखळून हसवणार आहे.
बाहुबळी (HT)

प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट खळखळून हसवणार आहे.

    • प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट खळखळून हसवणार आहे.

चित्रपट आणि मालिका म्हटले की प्रेक्षकांची चांगली करमणूक होते. प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकाराचा चित्रपट पाहण्यासाठी धडपड करत असतात. पण जर प्रेक्षकांना एकाच चित्रपटात ५० कलाकार पाहायला मिळणार असतील तर? प्रेक्षकांसाठी ही पर्वणीच असेल. असाच एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ५० कलाकार एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे नाव 'भाऊबळी' असे आहे.

ट्रेंडिंग न्यूज

स्वाती आणि इंद्राने मागितली मुक्ता हिची माफी, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत काय घडणार जाणून घ्या

'बाईपण भारी देवा' सिनेमा घरबसल्या पाहायला? मग जाणून घ्या कधी आणि कुठे पाहायला मिळणार

अमिताभ बच्चन यांचं शेजारी व्हायचंय? मोजावी लागणार मोठी किंमत! जाणून घ्या काय आहे नेमकी भानगड

चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कमल हासन यांच्या लेकीचा ब्रेकअप, काय आहे कारण?

समीर पाटील दिग्दर्शित 'भाऊबळी' हा एक धमाल विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रासंगिक विनोदावर आधारित या चित्रपटाची खासियत म्हणजे, ५० हून अधिक नामवंत कलाकारांची तगडी फौज या चित्रपटाला लाभली असून प्रेक्षकांना विनोदाचा तुफान धमाका यात अनुभवायला मिळणार हे नक्की! किशोर कदम, मनोज जोशी, मेधा मांजरेकर, ऋषिकेश जोशी, रेशम टिपणीस, प्रियदर्शिनी इंदलकर, आशय कुलकर्णी, संतोष पवार, तुषार घाडीगावकर, शार्दूल सराफ, सचिन भिलारे, आनंद अलकुंटे, विश्वास सोहनी, रसिका आगाशे, विजय केंकरे, श्रीकर पित्रे असे चित्रपटसृष्टीतील कसलेले, लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना खदखदून हसवण्याकरता येणार आहेत.
वाचा : आख्खं ब्रिटीश म्युझियम सक्रिय गुन्हेगारांचा अड्डा; कोहिनूर वादावर रवीनाचे ट्वीट

आपल्या भन्नाट विनोदशैलीने प्रत्येक व्यक्तिरेखा काही नवीन शिकवण देऊन जाईल. वास्तववादी असणाऱ्या या चित्रपटाचे निर्माते नितीन वैद्य, निनाद वैद्य आणि अपर्णा पाडगावकर आहेत. दोन वेगळ्या जीवनशैलीचे लोक जेव्हा समोरासमोर येतात, तेव्हा त्यांच्यात होणारे मतभेद, कलह, संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारी सूड भावना या चित्रपटात अगदी हलक्याफुलक्या विनोदी पद्धतीने दाखवण्यात आली आहे. प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना १६ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात नक्कीच यशस्वी होईल!

विभाग