Aai Kuthe Kay Karte: 'मी अरुंधती नाही', असे का म्हणाली संजना? मालिकेत नवे वळण
Jun 07, 2023, 12:51 PM IST
- Aai Kuthe Kay Karte: संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे आपण पाहात आहोत. आता संजना कांचनशी बोलताना थेट ‘मी अरुंधती नाही’ असे का बोलते जाणून घ्या…
Aai Kuthe Kay Karte: संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे आपण पाहात आहोत. आता संजना कांचनशी बोलताना थेट ‘मी अरुंधती नाही’ असे का बोलते जाणून घ्या…
- Aai Kuthe Kay Karte: संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे आपण पाहात आहोत. आता संजना कांचनशी बोलताना थेट ‘मी अरुंधती नाही’ असे का बोलते जाणून घ्या…
स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून 'आई कुठे काय करते' पाहिली जाते. गेल्या काही दिवसांपासून मालिकेत वेगवेगळ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. मालिकेत आशुतोषची बहिण वीणाची एण्ट्री होताच मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे. वीणामुळे अनिरुद्ध आणि संजना यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याचे पाहायला मिळते. आता या सगळ्यावरुन संजना चिडताना दिसते.
नुकताच सर्व मालिकांमध्ये वट पौर्णिमा हा सण साजरा करताना दाखवण्यात आले होते. आई कुठे काय करते मालिकेत देखील कांचन तिची सून संजनाला वट पौर्णिमेची पूजा करण्यास सांगते. संजना मात्र तिला नकार देते. 'मी कोणासाठी पूजा करायची आहे? अनिरुद्धसाठी? आमच्यात नवरा बायकोचं नातच उरलं नाहीये. हे सगळं नाटक करुन काय फायदा. या माणसाचं आयुष्य वाढावं म्हणून पूजा करायला मी काय अरुंधती नाहीये' असे संजना बोलताना दिसते.
वाचा: लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो! रवी जाधव यांच्या 'बाल शिवाजी'चे पोस्टर प्रदर्शित
आता संजना वट पौर्णिमेची पूजा करणार का? कांचन संजनाला जबरदस्ती पूजा करण्यास भाग पाडणार का? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. त्यांच्या या प्रश्नांची उत्तरे मालिकेच्या आगामी भागामध्ये मिळणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजना आणि अनिरुद्ध यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला आहे. हा दुरावा आशुतोषची बहिण वीणा आल्यामुळे निर्माण झाल्याचे म्हटले जात आहे. अनिरुद्ध आणि वीणा एकत्र काम करत असतात. आता संजना अनिरुद्धला सोडून जाणार का? असा प्रश्न देखील प्रेक्षकांना पडत आहे.
विभाग