Photo : आसाममध्ये पुराचा हाहाकार! ५५ जणांचा मृत्यू, लाखो नागरिकांना फटका
- Assam Flood : पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.
- Assam Flood : पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.
(1 / 10)
आसाममध्ये पावसाची संततधार सुरूच असून यामुळे गंभीर अशी पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना महापुराचा फटका बसला आहे.(फोटो - हिंदुस्तान टाइम्स)
(2 / 10)
महापुरामुळे १९ लाख नागरिकांना फटका बसला असून आतापर्यंत ५५ जण मृत्यूमुखी पडले आहेत.(फोटो - अनुवार हजारिका)
(3 / 10)
मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी पूरबाधितांची भेट घेऊन आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मुख्यमंत्री सरमा यांना फोन करून पूरस्थितीची माहिती घेतली.(फोटो - पीटीआय)
(4 / 10)
आसाममध्ये शुक्रवारी नाव उलटून झालेल्या दुर्घटनेत तीन मुले बेपत्ता झाली आहेत. त्यांचा शोध सुरू आहे.(फोटो - पीटीआय)
(5 / 10)
राज्यात शेकडो मदत शिबिरांची उभारणी केली असून त्यात एक लाखांहून अधिक पूरबाधितांनी आश्रय घेतला आहे.(फोटो - पीटीआय)
(6 / 10)
आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून पुरात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे. लाखो नागरिकांनी मदत शिबिरात स्थलांतर केले आहे. (फोटो - पीटीआय)
(7 / 10)
पुरामुळे ३ हजार गावांमध्ये पाणी शिरले आहे. तर काही ठिकाणी रस्ते वाहून गेल्यानं गावांचा संपर्क तुटला आहे.(फोटो - पीटीआय)
(8 / 10)
राज्यातील आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितलं की, होजई, नालबारी, बाजाली, ढुबरी, कामरूप, कोकराझार, सोनितपूर जिल्ह्यात मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत.(फोटो - अनुवार हजारिका)
(9 / 10)
आसाममध्ये पावसाचा जोर जास्त असून जवळपास सर्वच नद्या धोका पातळीच्या वरती आहेत. काही ठिकाणी भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत.(फोटो - एएफपी)
इतर गॅलरीज