Uddhav Thackeray : ‘शिंदे-फडणवीस हे लुटेरे; या लफंग्यांना छत्रपतींचं नाव घेण्याचा अधिकार नाही’
Maha Vikas Aaghadi Maha Morcha : महापुरुषांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुंबईत महामोर्चा काढला आहे. त्यावेळी उपस्थितांशी बोलताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
Maha Vikas Aaghadi Maha Morcha Mumbai Live Updates : महाविकास आघाडीनं मुंबईत काढलेल्या महामोर्चात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. माझ्याबरोबर लाखो महाराष्ट्रप्रेमी महाराष्ट्रद्रोह्यांच्या छाताडावर चालण्याची ही वेळ आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर पहिल्यांदाच मुंबईत असं दृष्य दिसलं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सरकारवर सडकून टीका केली आहे.
महापुरुषांच्या अपमानाविरोधात सर्व पक्ष एकवटलेत, परंतु महाराष्ट्रद्रोही शांत आहेत. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या तोत्यांनी खुर्चीसाठी दिल्लीची लाचारी केली. कोश्यारींना मी राज्यपाल मानत नाही. त्या पदावर बसून कुणीही टपल्या माराव्यात, हे आम्ही सहन करणार नाही. महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य करताना लाज नाही वाटत?, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपसह शिंदे गटावर प्रहार केला आहे.
फुले दाम्पत्यानं त्यावेळी अंगावर शेण झेललं नसतं तर आपणही शाब्दिक भीक मागत वैचारिक दारिद्र सिद्ध केलं असतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा जय बोलण्याचा अधिकार या लफंग्यांना नाही. हे महाराष्ट्राचे लुटेरे आहेत. खोके घेऊन, पाठीत वार करून, आईच्या कुशीत वार करून त्यांची तुलना शिवाजी महारांजाबरोबर करताय?, परंतु आता या गर्दीनं महाराष्ट्रद्रोह्यांचे डोळे उघडायला हवेत. मुंबईतील जागा बिल्डरच्या घशात घालतायतं. मुंबई, महाराष्ट्र ही आमची मातृभूमी आहे. भाजपचे लोक स्क्वेअर फूटावर मुंबईला मोजतात, अशा शब्दात ठाकरेंनी भाजप शिंदे गटाला सुनावलं आहे.