Tu Chal Pudha: शिल्पी खरंच बदलणार की हे सगळं नाटक आहे? मालिका नव्या वळणावर
Tu Chal Pudha: शिल्पी माझ्यासोबत राहायला तयार असेल तरच मी तिला माफ करेन, अशी अट विद्युत ठेवतो. त्यामुळे आता शिल्पी खरच बदलली आहे की दिखाव्यापुरता हे मालिकेच्या आगामी भागात कळणार आहे.
झी मराठी वाहिनीवरील 'तू चाल पुढं' ही मालिका सध्या चर्चेत आहे. या मालिकेत एका सामान्य कुटुंबातील एक पत्नी-सून आणि आई अशा तिहेरी जबाबदाऱ्या अतिशय संयमीपणे सांभाळणाऱ्या अश्विनी वाघमारे या महिलेची कथा दाखवण्यात आली आहे. आता मालिका एका वेगळ्या वळणावर पोहोचली आहे.
ट्रेंडिंग न्यूज
‘तू चाल पुढं’ मालिकेत अनेक ट्विस्ट पाहायला मिळतायत, नुकतंच आपण पाहिलं शिल्पीचा खोटेपणाचे सत्य घरातील सर्वांसमोर आलं सर्वांनाच माहीत पडते. त्यानंतर विद्युत शिल्पीला घटस्फोटाची नोटीस पाठवतो. शिल्पी घरी तांडव करते. आणि आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. पण मग अश्विनी तिला आणि विद्युतला समजावते. विद्युत काही ऐकायला तयार नाही.
संस्क्रांतीचं हळदीकुंकु हे दरवर्षी अश्विनीकडे असतंच त्यामुळे लोकांना दाखवण्यासाठी या दु:खाच्या प्रसंगी देखील घरात हळदीकुंक करण्याचं अश्विनी ठरवते आणि या कार्यक्रमात शिल्पी आणि विद्युतला एकत्र आणण्याचं ठरवते. शिल्पी माझ्यासोबत राहायला तयार असेल तरच मी तिला माफ करेन, अशी अट विद्युत ठेवतो. त्यामुळे शिल्पीची रितसर पाठवणी केली जाते. आता शिल्पी शिल्पी खरंच बदलेल की हे सगळं नाटक आहे हे येणाऱ्या भागातच कळेल.
विभाग