Shark Tank India 2: ‘ज्याला कुणीच ओळखत नाही अशा लोकांना सांगावं लागतं!’ शार्क आपापसांतच भिडले
Shark Tank India 2: नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शार्क अमित जैन आणि अनुपम मित्तल एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसले आहेत.
Shark Tank India 2: आपल्या वेगवगेळ्या कल्पना आणि त्यातून उभारलेले उद्योग यांना तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळावे म्हणून ‘शार्क टँक’सारख्या कार्यक्रमांची सुरुवात झाली आहे. या मंचावर अनेक उद्योजकांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना आपल्या कंपनीमध्ये सामील करून, आपल्या उद्योगांना एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे. यंदा ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र, या वेळी ‘शार्क’ अर्थात गुंतवणुकीसाठी आलेले उद्योजकच एकमेकांशी वाद घालताना दिसत आहेत.
नुकत्याच पार पडलेल्या एका भागात शार्क अमित जैन आणि अनुपम मित्तल एकमेकांवर ताशेरे ओढताना दिसले आहेत. एका पीच दरम्यान अनुपम मित्तल उद्योजकाला एका विषयावरून बोलताना दिसले. त्यावेळी अमित जैन अनुपम मित्तल यांना पाहून म्हणाले की, ‘अनुपम मित्तलकडे काहीही आयडिया नसतात. जर, आयडिया असत्या तर त्याने आयुष्यात आणखी काही केले असते. मी चार कंपन्या बनवल्या आहेत. अनुपम फक्त गुंतवणूक करतात आणि नंतर भेटत पण नाहीत.’
यानंतर अनुपम देखील शांत बसला नाही. त्याने देखील अमित जैन यांना थेट उत्तर दिले. अनुपम म्हणाला की, ‘ज्याला कुणीच ओळखत नाही अशा लोकांना सांगावं छाती ठोकून सांगावं लागतं की आम्ही चार कंपन्या बनवल्या आहेत.’ यानंतर दोघांमध्ये शाब्दिक वाद रंगले होते. या दोघांच्या मध्ये बसलेल्या नमिता थापर यांना मात्र दोघांमध्ये समजोता घडवून आणावा लागला.
नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात धुळ्यातील डॉक्टर दाम्पत्याने त्यांच्या एका नव्या कल्पनेसाठी शार्क्सकडे आर्थिक आणि मार्केटिंगची मदत मागितली होती.
विभाग