मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई’; ‘मुलगी झाली हो’मधील ‘माऊ’ झळकणार नव्या मालिकेत!

Man Dhaga Dhaga Jodte Nava: स्त्रीच्या अस्तित्वाची लढाई’; ‘मुलगी झाली हो’मधील ‘माऊ’ झळकणार नव्या मालिकेत!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 10, 2023 09:20 AM IST

Man Dhaga Dhaga Jodte Nava New Serial: ‘मन धागा धागा जोडते नवा’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, यात ‘मुलगी झाली हो’ फेम ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर मुख्य भूमिका साकारणार आहे.

Divya Pugaonkar
Divya Pugaonkar

Man Dhaga Dhaga Jodte Nava New Serial: मराठी मनोरंजन विश्वात सध्या अनेक नव्या मालिकांची एन्ट्री होत आहे. नवा दमदार कंटेंट, वेगवेगळे विषय आणि लोकप्रिय चेहरेसोबत घेऊन काही नव्या मालिका नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. यातच आता आणखी एका मालिकेची यात भर पडणार आहे. छोट्या पडद्यावरील स्टार प्रवाह या वाहिनीवर आता ‘मन धागा धागा जोडते नवा’ अशा नावाची एक मालिका दाखल होत असून, या मालिकेत ‘मुलगी झाली हो’ फेम ‘माऊ’ म्हणजेच अभिनेत्री दिव्या पुगावकर मुख्य भूमिका साकारणार आहे.

अभिनेत्री दिव्या पुगावकर हिने ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत साजिरी हे पात्र साकारले होते. या व्यक्तिरेखेला सगळेच प्रेमाने ‘माऊ’ म्हणायचे. त्यामुळे दिव्या देखील ‘माऊ’ म्हणून खूप प्रसिद्ध झाली आहे. काहीच दिवसांपूर्वी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका ऑफ एअर गेली होती. त्यानंतर अवघ्या काहीच दिवसांत तिला दुसऱ्या एका मालिकेत मुख्य भूमिका मिळाली आहे. पुन्हा एकदा लाडक्या ‘माऊ’ला छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने तिचे चाहते देखील खूश झाले आहेत.

‘मन धागा धागा जोडते नवा’ या मालिकेचा पहिला प्रोमो नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या प्रोमोत अभिनेत्री दिव्या पुगावकर झळकली आहे. या प्रोमोमधून मालिकेचा विषय देखील प्रेक्षकांना कळला आहे. या प्रोमोत एक छोटसं एकत्र कुटुंब पाहायला मिळतं. जेवणाच्या ताटावर बसलेला भाऊ आमटीत साखर का टाकली?, यावरून बहिणीला बोल लागाव्ण्यास सुरुवात करतो. तर, संसार सोडून माहेरच्या घरी परत आलेली बहीण सगळ्यांसाठी राबत आहे. मात्र, तिला टोमणे मारण्याची एकही संधी कुणी सोडत नाही.

‘हिने हिच्या घरीसुद्धा असाच आगाऊपणा केला असेल, म्हणून नवऱ्याने सोडलं’, असा टोमणा भाऊ तिला मारतो. भावाचं हे बोलणं ऐकून तिच्या मनाला मात्र खूप त्रास होतो. भरला संसार सोडून घरी परतलेली मुलगी आणि तिला समाजाकडून मिळणारे टोमणे यावर या मालिकेची कथा आधारित आहे. आता या मालिकेच्या नायिकेच्या आयुष्यात नक्की काय घडलंय, ती माहेरी परत का आली आहे आणि तिच्यसोबत काय घडलंय, हे मालिकेच्या कथेत पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग