कियारा अडवाणीमुळे मोडणार होता ‘शार्क’ अश्नीर ग्रोव्हरचा संसार! काय होतं नेमकं कारण? वाचा...
Kiara Advani-Ashneer Grover: कियारा अडवाणीमुळे कधीकाळी अश्नीर ग्रोव्हर यांचा संसार तुटण्याच्या मार्गावर आला होता. कियारा अडवाणीच्या लग्नाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा हा किस्सा चर्चेत आला आहे.
Kiara Advani-Ashneer Grover: सध्या अभिनेत्री कियारा अडवाणी तिच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्री लवकरच अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधणार आहे. मात्र, या दरम्यान ‘शार्क’ अश्नीर ग्रोव्हर देखील चर्चेत आले आहेत. कियारा अडवाणीमुळे कधीकाळी अश्नीर ग्रोव्हर यांचा संसार तुटण्याच्या मार्गावर आला होता. कियारा अडवाणीच्या लग्नाच्यानिमित्ताने पुन्हा एकदा हा किस्सा चर्चेत आला आहे. अश्नीर ग्रोव्हर यांनी आपल्या ‘दोगलापन’ या पुस्तकातून हा किस्सा सांगितला आहे.
ट्रेंडिंग न्यूज
‘दोगलापन’ या पुस्तकात अश्नीर ग्रोव्हर यांनी कियारा अडवाणीचाही उल्लेख केला आहे. त्यांनी पुस्तकात म्हटले आहे की, एक वेळ अशी आली होती, जेव्हा कियारा अडवाणीमुळे त्यांचे घर तुटणार होते. हे प्रकरण इतके पुढे गेले होते की, त्यांचे नाते घटस्फोटापर्यंत पोहोचले होते. अश्नीरच्या या पुस्तकातून आयुष्यातील काही कटू सत्यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. यात अश्नीर ग्रोव्हर यांनी एक किस्सा सांगितला आहे. एकदा अश्नीर आणि त्याच्या मित्रांमध्ये एका विषयावरून संभाषण चालले होते. या दरम्यान त्यांच्यातील एका मित्राच्या लग्नाची बोलणी सुरू होती.
त्यांच्या या संभाषणात कियारा अडवाणीच्या स्थळाचा देखील उल्लेख झाला. यावेळी अश्नीर गंमतीत आपल्या आईला म्हणाले की, जरा माझं लग्न आताच्या काळात झालं असतं, तर मला देखील कियारा अडवाणीचं स्थळ सांगून आलं असतं. त्यांचं हे बोलणं ऐकून पत्नी माधुरी जैन यांना वाईट वाटलं.
यानंतर अश्नीर ग्रोव्हर यांच्या पत्नीने त्यांच्याशी बोलणेच टाकले होते. याच दरम्यान त्यांना एका कामानिमित्ताने बाहेर जायचे होते. त्याचवेळी गाडीतून विमानतळापर्यंत जात असताना त्यांच्या पत्नीने त्यांच्याशी बराच वाद घातला. यानंतर माधुरी यांनी अश्नीर यांना विचारले की, तुम्हाला खरंच कियाराशी लग्न करायचे आहे का? या घटनेनंतर अश्नीर यांनी पुन्हा कधीच कोणत्याही अभिनेत्रीचे नाव घेतले नाही.