मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Charu Asopa : ‘तो माझ्यावर संशय घ्यायचा’, चारू असोपाचे सुष्मिता सेनच्या भावावर गंभीर आरोप!

Charu Asopa : ‘तो माझ्यावर संशय घ्यायचा’, चारू असोपाचे सुष्मिता सेनच्या भावावर गंभीर आरोप!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Nov 03, 2022 05:58 PM IST

Charu Asopa : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे प्रसिद्धी झोतात आले आहेत.

Rajeev Sen - Charu Asopa
Rajeev Sen - Charu Asopa

Charu Asopa : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन (Rajeev Sen) यांच्या वैवाहिक जीवनात सध्या बराच गदारोळ सुरू आहे. घटस्फोटाच्या चर्चांमुळे दोघेही प्रसिद्धी झोतात आले आहेत. लग्नाच्या काही महिन्यांनंतर या दोघांच्या नात्यात गोष्टी बिनसल्या असल्याच्या बातम्या येत होत्या. दोघांनीही गणपती बाप्पाच्या आगमनानंतर आपल्या नात्याला पुन्हा एक संधी देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले आहेत. सध्या दोघेही एकमेकांवर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. दरम्यान आता चारूने राजीववर अनेक गंभीर आरोप केले आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

चारू असोपाने नुकत्याच एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत राजीवसोबतच्या तिच्या नात्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत. यावेळी ती म्हणाली की, लग्नानंतर काही दिवसांतच तिच्यात आणि राजीवमध्ये बरेच वाद झाले होते. भांडण होताच राजीव आपल्याला सोडून निघून जायचा. इतकंच नाही तर, कॉल आणि सोशल मीडियावरूनही ब्लॉक करायचा. तो आपल्यावर सतत संशय घ्यायचा, असा आरोप देखील चारूने केला आहे. लग्नांनंतरही राजीवचे अफेअर सुरु होते, तसेच त्याने आपल्याला मारहाण केल्याचा आरोप देखील तिने केला होता.

अभिनेत्री म्हणाली की, जेव्हा राजीव तिला तीन महिने एकटं सोडून गेला होता. त्यानंतर तिने मालिकांसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली आणि त्यावेळी तिला 'अकबर का बाल बिरबल' हा शो मिळाला. सगळं काही विसरून चारू कामात रमली होती. मग, अचानक एक दिवस राजीव परत आला. मात्र, जेव्हा ती कामावर जायची, तेव्हा तो तिच्या सहकलाकारांना तिच्यापासून दूर राहा, असे मेसेज पाठवायचा. त्याच्या अशा वागण्यामुळे मी खूप हैराण झाले आणि तो शो देखील माझ्या हातून गेला, असे चारू आपल्या मुलाखतीत म्हणाली. घरगुती वादांमुळे चारू असोपाला मालिकेतून रिप्लेस करण्यात आले होते. चारू आणि राजीव यांच्या वादाचा मालिकेवर परिणाम होऊ नये म्हणून चारूला ‘अकबर का बाल बिरबल’मधून ब्रेक देण्यात आला होता.

मात्र, या सगळ्यात राजीवची बहीणबॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेन हिने नेहमीच आपल्याला पाठींबा दिल्याचे देखील चारूने म्हटले. जर, आपल्याला या नात्यामुळे इतका त्रास होत असेल, तर नातं तोडून वेगळं व्हावं आणि आनंदी जीवन जगावं, असा सल्ला सुष्मिताने दिल्याचे देखील ती म्हणाली.

IPL_Entry_Point

विभाग