मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte: यशच्या आयुष्यात गौरी परतणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवे वळण!

Aai Kuthe Kay Karte: यशच्या आयुष्यात गौरी परतणार? ‘आई कुठे काय करते’ मालिकेत नवे वळण!

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 16, 2023 01:16 PM IST

Aai Kuthe Kay Karte latest Update: गौरी परदेशी निघून गेल्याने यश कोलमडून गेला आहे. गौरीच्या निघून जाण्याचं दुःख विसरण्यासाठी यश स्वतःला कामात झोकून देत आहे.

Aai Kuthe Kay Karte
Aai Kuthe Kay Karte

Aai Kuthe Kay Karte latest Update: छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या मनोरंजक वळणावर पोहोचली आहे. एकीकडे ‘आई’ अर्थात अरुंधतीचा नवा संसार सुरू झाला आहे. मात्र, तरीही तिची अनेक जबाबदाऱ्यांमधून मुक्तता झालेली नाही. अरुंधती स्वतः संसार सांभाळतानाच पोटच्या मुलांना देखील सावरत आहे. एकीकडे ईशा लग्नाचा हट्ट धरून बसली आहे. तर, दुसरीकडे गौरी निघून गेल्याने यश कोलमडून गेला आहे. गौरीच्या निघून जाण्याचं दुःख विसरण्यासाठी यश स्वतःला कामात झोकून देत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

यश या सगळ्यातून सावरत असतानाच आता गौरी त्याच्या आयुष्यात परतून येणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. याचं कारण म्हणजे मालिकेचा नवा प्रोमो... या प्रोमोत गौरीच्या घरच्या लाईट्स सुरू झालेल्या दिसत आहेत. देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यासमोरच्या घरातच गौरी राहत होती. याच घराच्या लाईट्स अचानक चालू होताना दिसल्या आहेत. या लाईट्स बघून आता यशच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गौरी आपल्याकडे परतून आली, असे यशला वाटत आहे. एकीकडे यश सावरत असतानाच आता जर गौरी खरंच परतून आली असेल, तर मालिकेच्या कथानकाला एक नवे वळण येणार आहे.

गौरी यशशी असणारं नातं मोडून परदेशी निघून गेली होती. आधीच यश आणि गौरी एकमेकांपासून मनाने खूप दुरावले होते. गौरीचं कामानिमित्त परदेशी जाणं आणि अचानक यशशी सगळे संबंध तोडणं, यामुळे आधीच त्यांच्या नात्यात अनेक वितुष्ट आले. मात्र, यानंतर गौरी यशसोबतचा साखरपुडा मोडूनच परदेशी गेली होती. तिच्या अशा वागण्यामुळे यश मात्र पुरता खचून गेला होता. या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने स्वतःला गाण्यांच्या कामामध्ये झोकून दिलं आहे. तो सावरत असतानाच जर आता पुन्हा गौरीची एन्ट्री झाली, तर यशसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

आधी अभिषेक आणि अनघाचा संसार, त्यानंतर यश आन गौरीचा साखरपुडा मोडणं आणि त्यानंतर ईशा-अनिशचं नातं ही सगळी गुंतागुंत सोडवण्यात अरुंधती अगदीच गढून गेली आहे. आता कुठे अनघा आणि अभिषेकचा संसार मार्गी लागला आहे. तर, यश देखील या धक्क्यातून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. गौरी आणि अनिशचं देखील लग्न लावून देण्याचा निर्णय अरुंधतीने घेतला आहे.

IPL_Entry_Point