मराठी बातम्या  /  क्रीडा  /  T20 World Cup: टीम इंडिया वर्ल्डकप कसा जिंकणार? या पाच खेळाडूंनी वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन

T20 World Cup: टीम इंडिया वर्ल्डकप कसा जिंकणार? या पाच खेळाडूंनी वाढवलं रोहित शर्माचं टेन्शन

Sep 08, 2022, 04:46 PM IST

    • team india t20 world cup: BCCI १५ सप्टेंबरपूर्वी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेचा विषय म्हणजे गोलंदाजांची दुखापत. भारताचे एकूण पाच प्रमुख गोलंदाज फिटनेसच्या समस्यांशी झुंज देत आहेत. अशा स्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
T20 World Cup

team india t20 world cup: BCCI १५ सप्टेंबरपूर्वी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेचा विषय म्हणजे गोलंदाजांची दुखापत. भारताचे एकूण पाच प्रमुख गोलंदाज फिटनेसच्या समस्यांशी झुंज देत आहेत. अशा स्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    • team india t20 world cup: BCCI १५ सप्टेंबरपूर्वी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेचा विषय म्हणजे गोलंदाजांची दुखापत. भारताचे एकूण पाच प्रमुख गोलंदाज फिटनेसच्या समस्यांशी झुंज देत आहेत. अशा स्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

आशिया कप २०२२ मधील भारतीय संघाचा प्रवास संपुष्टात आला आहे. बुधवारी झालेल्या सामन्यात पाकिस्तानने अफगाणिस्तानचा एका विकेटने पराभव केला. पाकिस्तानच्या विजयामुळे भारत आणि अफगाणिस्तान हे दोन्ही संघ फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडले. आशिया चषकात निराशाजनक खेळ दाखवल्यानंतर आता भारतीय संघाचे मुख्य लक्ष्य टी-२० विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यावर आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Vijay Chaudhari DGP Medal : ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांना 'पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह'

who is D Gukesh : बुद्धिबळाचा नवा चाणक्य डी गुकेश कोण आहे? वयाच्या १७व्या वर्षी जिंकली कँडिडेट्स चेस टूर्नामेंट

Paris Olympics 2024: पॅरिस ऑलिम्पिकच्या खेळाडूंमध्ये वाटले जाणार ३ लाख कंडोम; 'हे' आहे कारण

Achinta Sheuli: वेटलिफ्टर अचिंता शिऊलीचे धक्कादायक कृत्य; रात्रीचं गर्ल्स हॉस्टेलमध्ये घुसला अन्...

BCCI १५ सप्टेंबरपूर्वी T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करू शकते, पण त्याआधी चिंतेचा विषय म्हणजे गोलंदाजांची दुखापत. भारताचे एकूण पाच प्रमुख गोलंदाज फिटनेसच्या समस्यांशी झुंज देत आहेत. अशा स्थितीत दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जोरावर टीम इंडिया विश्वचषक कसा जिंकणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

जसप्रीत बुमराह:

<p>jasprit bumrah</p>

जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजी युनिटचा आहे. तो पाठीच्या दुखापतीशी झुंज देत आहे. या दुखापतीमुळे त्याला आशिया कपमधूनही बाहेर व्हावे लागले होते. बुमराह ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतूनही बाहेर राहण्याची शक्यता आहे. बुमराह टी-२० विश्वचषकापूर्वी तंदुरुस्त होईल, अशी आशा भारतीय चाहत्यांना आहे.

हर्षल पटेल :

<p>harshal patel</p>

बरगडीच्या दुखापतीमुळे हर्षल पटेलला आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. हर्षल पटेल सध्या एनसीएमध्ये आहे आणि या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या T20I मालिकेदरम्यान तो मैदानात परतण्याची अपेक्षा आहे. हर्षल पटेल हा स्लो बॉलसह यॉर्कर टाकण्यात माहिर आहे, त्यामुळे तो ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर धोकादायक ठरू शकतो.

रवींद्र जडेजा:

<p>ravindra jadeja</p>

स्टार अष्टपैलू रवींद्र जडेजालाही दुखापतीमुळे चालू आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. जडेजाच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती, आता त्याचे यशस्वी ऑपरेशन झाले आहे. शस्त्रक्रियेनंतरही रवींद्र जडेजाचे टी-20 विश्वचषकात खेळणे कठीण मानले जात आहे.

आवेश खान:

<p>avesh khan</p>

आवेश खानला तापाशी संबंधित आजारामुळे आशिया चषकातील उर्वरित सामन्यांमधूनही बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी वेगवान गोलंदाज दीपक चहरचा संघात समावेश करण्यात आला. वेस्ट इंडिज दौऱ्यापासून आवेश खराब फॉर्ममध्ये आहे आणि त्याने हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यातur ५० हून अधिक धावा दिल्या होत्या. पण त्याची तब्येतही भारतीय संघासाठी चिंतेचे कारण आहे.

प्रसिद्ध कृष्णा:

<p>prasidh krishna</p>

न्यूझीलंड-ए विरुद्धच्या सध्याच्या मालिकेसाठी प्रसिद्ध कृष्णा भारत-अ संघात आहे. पण पाठीच्या दुखापतीमुळे कृष्णाला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. कृष्णा बाहेर पडल्यानंतर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचा भारत-अ संघात समावेश करण्यात आला आहे.