मराठी बातम्या  /  धर्म  /  Mokshda Ekadashi : का साजरी केली जाते मोक्षदा एकादशी, काय आहे मोक्षदा एकादशीचं महत्व

Mokshda Ekadashi : का साजरी केली जाते मोक्षदा एकादशी, काय आहे मोक्षदा एकादशीचं महत्व

Nov 29, 2022, 03:50 PM IST

  • Reason Behind Celebrating Mokshada Ekadashi : याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती शक्य होते.

मोक्षदा एकादशी (हिंदुस्तान टाइम्स)

Reason Behind Celebrating Mokshada Ekadashi : याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती शक्य होते.

  • Reason Behind Celebrating Mokshada Ekadashi : याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती शक्य होते.

मार्गशीर्ष शुक्ल एकादशीला मोक्षदा एकादशी येते. या शुभ प्रसंगी मौनव्रत पाळले जाते ज्यामुळे मोक्षप्राप्ती शक्य होते. याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेचे ज्ञान दिले. मोक्षदा एकादशीच्या दिवशी पूजा केल्याने मनुष्याला मोक्षप्राप्ती शक्य होते.

ट्रेंडिंग न्यूज

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीया कधी आहे? सोनं खरेदी करण्याची ही शुभ वेळ नोंद करून ठेवा

Marriage Mantra : मुलींच्या लग्नासाठी सर्वात प्रभावी मंत्र, मुलांची रांग लागेल, एकदा आजमावून पाहा

Mangalsutra : सौभाग्याचं प्रतीक मंगळसुत्र घालण्याची परंपरा कधी आणि कशी सुरू झाली? जाणून घ्या

Rashtrasant Tukdoji Maharaj Jayanti : आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती, वाचा त्यांचा जीवन प्रवास

मोक्षदा एकादशी हा आपल्या धर्मग्रंथांमध्ये अतिशय शुभ दिवस मानला जातो आणि तो नोव्हेंबर महिन्यातील ११व्या चंद्र दिवशी म्हणजेच एकादशीच्या दिवशी येतो.

मोक्षदा एकादशी हा भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित एक अत्यंत शुभ दिवस आहे. ज्या दिवशी कृष्णाने पांडव राजकुमार अर्जुनाला भगवद्गीतेचा पवित्र उपदेश दिला होता, ज्याचे हिंदू महाकाव्य महाभारतात वर्णन केले आहे. कुरुक्षेत्र येथे पांडव आणि त्यांचे चुलत भाऊ कौरव यांच्यात झालेल्या महाभारत युद्धाच्या सुरुवातीला सांगितलेली ७०० श्लोकांची भगवद्गीता विविध हिंदू तात्विक कल्पनांशी संबंधित आहे. मोक्षदा एकादशीला 'मौना एकादशी' म्हणूनही ओळखले जाते आणि या दिवशी भक्त दिवसभर 'मौन' पाळतात. असे मानले जाते की या दिवशी व्यक्तीला संपूर्ण आयुष्यात केलेल्या वाईट कर्मांपासून मुक्ती मिळते. मोक्षदा एकादशीच्या व्रताच्या दिवशी काहीही खातपित नाही आणि दिवस मौनात घालवला जातो.एकादशी तिथीच्या सूर्योदयापासून द्वादशी तिथीच्या सूर्योदयापर्यंत २४ तास उपवास केला जातो जो निर्जल आहे. असे मानले जाते की जो नियमितपणे हे व्रत करतो त्याला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो.

मोक्षदा एकादशीला पूजा कशी करावी?

  • सकाळी स्नान केल्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करा.
  • यानंतर पिवळे वस्त्र परिधान करून श्रीकृष्णाची पूजा करावी.
  • श्रीकृष्णाला पिवळी फुले, पंचामृत आणि तुळस अर्पण करा.
  • यानंतर भगवान श्रीकृष्णाच्या मंत्रांचा जप करा किंवा भगवद्गीतेचे पठण करा.
  • एखाद्या गरीब व्यक्तीला कपडे किंवा अन्न दान करा.
  • तसे, जलविरहित उपवास ठेवणे चांगले. पण गरज भासल्यास पाण्याचा आहार आणि फळे घेता येतील.

(या लेखात दिलेल्या माहितीवर, ती पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल. जे केवळ सामान्य जनहित लक्षात घेऊन मांडण्यात आले आहे.)

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा