मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Abhishek-Karisma: अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा का मोडला? अनेक वर्षांनी कारण आले समोर

Abhishek-Karisma: अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा का मोडला? अनेक वर्षांनी कारण आले समोर

Aarti Vilas Borade HT Marathi

Nov 22, 2022, 02:18 PM IST

    • 'हां मैंने भी प्यार किया' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडण्याचे कारण सांगितले आहे.
अभिषेक बच्चन (HT)

'हां मैंने भी प्यार किया' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडण्याचे कारण सांगितले आहे.

    • 'हां मैंने भी प्यार किया' चित्रपटाच्या दिग्दर्शकाने अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडण्याचे कारण सांगितले आहे.

एकेकाळी बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री करिश्मा कपूर यांचे अफेअर लाइमलाइटमध्ये होते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा सर्वत्र रंगल्या होत्या. तो दोघे लग्न करणार होते. त्यांच्या साखरपुड्याची तारीख ही ठरली होती. पण अचानक एक दिवस त्यांचा ब्रेकअप झाल्याचे समोर आले. त्यामागचे कारण अद्याप समोर आले नव्हते. आता अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा का मोडला हे समोर आले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कपिलच्या शोमध्ये सनी असं काय म्हणाला की बॉबी देओलच्या डोळ्यात आलं पाणी? Viral video बघाच

अमृता खानविलकर नवरा हिमांशूसोबत फोटो का नाही शेअर करत? स्वतःच कारण सांगताना म्हणाली...

कोरोना व्हॅक्सिन ठरलं अभिनेता श्रेयस तळपदेच्या हार्ट अटॅकच कारण? अभिनेता म्हणतो ‘खरं सांगू तर...’

झीरोतून बनले हिरो अन् उभी केली ‘टी सीरिज’ कंपनी! गुलशन कुमार यांची संघर्षकथा माहितीय का?

चित्रपट निर्माता सुनील दर्शनने एका मुलाखतीमध्ये अभिषेक बच्चन आणि करिश्मा कपूर यांच्या नात्यामध्ये दुरावा का निर्माण झाला याचा खुलासा केला आहे. अभिषेक आणि करिश्मा २००० साली एकमेकांना डेट करत होते. जवळपास पाच वर्षे त्यांनी एकमेकांसोबत घालवली. त्यानंतर ते लग्नबंधनात अडकणार होते. मात्र त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला. सुनील दर्शनने त्यांच्यासोबत 'हां मैंने भी प्यार किया' या चित्रपटासाठी काम केले होते. चित्रपटाच्या वेळी त्या दिग्दर्शकाला त्यांच्या नात्याविषयी माहिती होते.
वाचा: मान कापणाऱ्याने आपली मान कापायच्या आधी...; सावरकरांचा संदर्भ देत शरद पोंक्षेंनी शेअर केला व्हिडीओ

सुनील दर्शनने अभिषेक आणि करिश्माविषयी बोलताना सांगितले की, 'त्या दोघांचे नाते हे अफवा नव्हत्या. ते खरोखर लग्न करणार होते. त्यांचा साखरपुडा देखील झाला होता. पण चित्रपटाच्या वेळी मला जाणवले की ते दोघे एकमेकांकरिता बनलेले नाहीत. त्यांच्यामध्ये सतत भांडणे होत होती. काही लोक अशी असतात. त्या दोघांना पाहून मला आश्चर्य वाटायचे की हे दोघे खरच एकमेकांसाठी बनले आहेत? अभिषेक खूप स्वीट आहे आणि करिश्मा पण चांगली आहे. पण त्यांच्या नशीबात काही वेगळे लिहिले होते.'

आज करिश्मा आणि अभिषेक आपापल्या आयुष्यात खूप आनंदी आहेत. करिश्मासोबतचे नाते तुटल्यानंतर अभिषेक बच्चनने अभिनेत्री ऐश्वर्या रायला डेट करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता त्यांना एक मुलगी आहे. तर दुसरीकडे करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. तिला दोन मुले आहेत. २०१६मध्ये करिश्माने पतीला घटस्फोट दिला.

विभाग