मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Aai Kuthe Kay Karte 11 august 2022: अनिरुद्ध- आशुतोषमध्ये पुन्हा उडणार शाब्दिक चकमक

Aai Kuthe Kay Karte 11 august 2022: अनिरुद्ध- आशुतोषमध्ये पुन्हा उडणार शाब्दिक चकमक

Payal Shekhar Naik HT Marathi

Aug 11, 2022, 02:18 PM IST

    • aai kuthe kay karte latest episode update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' पुन्हा एकदा रंजक वळणावर आली आहे. मालिकेत अनिरुद्ध आणि आशुतोष यांच्यात बाचाबाची होताना दिसणार आहे.
आई कुठे काय करते

aai kuthe kay karte latest episode update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' पुन्हा एकदा रंजक वळणावर आली आहे. मालिकेत अनिरुद्ध आणि आशुतोष यांच्यात बाचाबाची होताना दिसणार आहे.

    • aai kuthe kay karte latest episode update: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते' पुन्हा एकदा रंजक वळणावर आली आहे. मालिकेत अनिरुद्ध आणि आशुतोष यांच्यात बाचाबाची होताना दिसणार आहे.

aai kuthe kay karte episode 11 august update :'आई कुठे काय करते' गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मन जिंकते आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अरुंधती, आशुतोष, अनिरुद्ध, संजना यांनी प्रेक्षकांना आपलंस केलं आहे. आता मालिकेत काय होणार याची उत्सुकता कायम प्रेक्षकांना असते. अशातच मालिकेत अनिरुद्ध आणि आशुतोष यांच्यात शाब्दिक बाचाबाची होताना दिसणार आहे. संपूर्ण कुटुंब जेवायला बसलेलं असताना त्यांच्यात वाद होताना दिसणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

बायकोचं सामान उचलून कुशल बद्रिके निघाला फिरायला, मजेशीर फोटो शेअर करत म्हणाला...

लंडनमध्ये राधिका मर्चंट- अनंत अंबानीसाठी पाकिस्तानी गायक अतिफ असलमने गायले गाणे, फोटो व्हायरल

Actor Sahil Khan arrested: महादेव बेटिंग ॲप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला अटक

पूर्व पत्नी रीना दत्ता हिने आमिर खान याच्या लगावली होती कानशि‍लात, काय होते कारण?

इशा निल विरुद्धची केस जिंकल्याने सगळे घरातले आनंदित आहेत. त्यात अरुंधती आशुतोषला तिच्या घरी घेऊन येते. वकील म्हणून सुलेखा ताईदेखील तिथेच असतात. त्यामुळे घरातले सगळे त्यांना जेवायचं आग्रह करतात. मात्र जेवणाच्या टेबलवर वेगळंच नाट्य पाहायला मिळणार आहे. अरुंधती आणि संजना जेवण वाढत असताना आशुतोष त्यांना त्यांच्या सोबत जेवायला बसण्याचा आग्रह करतो. मात्र त्याला अनिरुद्ध ताबडतोब विरोध करतो. आमच्या घरातल्या स्त्रिया सगळे जेवल्यावरच जेवतात असं तो म्हणतो. त्यावर आशुतोष मला आणि आईला हे पटत नाही असं म्हणतो. या गोष्टीवरून पुढे तणाव वाढताना दिसणार आहे.

अरुंधती आता मोकळी झाली असली तरी तिने घराची जबाबदारी सोडलेली नाही. त्यामुळे अजूनही देशमुख कुटुंबात तिचं येणं जाणं आहे. त्यात अनिरुद्धला संजना घरात राहायला नकोय. आशुतोष आणि सुलेखा ताईंसोबत अरुंधतीची जवळीक वाढतेय, आता मालिकेत नक्की काय होणार, याची प्रेक्षकांना देखील उत्सुकता लागली आहे.