Raj Thackeray : मराठी जनांनी 'ही' शपथ घ्यावी; शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं राज ठाकरे यांचं आवाहन
Raj Thackeray on Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Raj Thackeray on Shivrajyabhishek Din : छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५० वा राज्याभिषेक दिन ६ जून रोजी आहे. त्या निमित्तानं राज्यभरात उत्साह आहे. राज्याभिषेकाच्या निमित्तानं किल्ले रायगडासह राज्यभर विविध कार्यक्रम होत असून एकमेकांना शुभेच्छाही दिल्या जात आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा देताना त्यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या एका विधानाचा दाखला दिला आहे.
ट्विटरवरील आपल्या शुभेच्छा संदेशात राज ठाकरे म्हणतात, '३५० वर्षांपूर्वी झालेला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा साधासुधा राज्याभिषेक नव्हता. मध्ययुगातील इस्लाम आक्रमकांच्या काळात स्वतःचं सार्वभौम राज्य असावं असं स्वप्न सुद्धा ह्या देशात जेव्हा पडत नव्हतं, तेव्हा एका राजानं स्वराज्याची निर्मिती करून एका नव्या युगाची सुरुवात झाल्याची नांदीच दिली होती. त्यानंतर पार अटकेपार गेलेल्या मऱ्हाठा साम्रज्याची प्रेरणा असो की देशाच्या स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा हे महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होतं ह्यात शंका नाही. पुढं स्वातंत्र्योत्तर काळात पण खरंतर हीच प्रेरणा असायला हवी होती, ती किती आहे हे आपण बघतच आहोत. असो.
Shivrajyabhishek Din 2023 : छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला किल्ले रायगड; शिवराज्यभिषेक सोहळ्यास जल्लोषात सुरुवात
मी आणि माझे सहकारी उद्या सूर्योदयाच्या आसपास महाराजांना रायगडावर जाऊन महाराजांना अभिवादन करणार आहोतच, पण माझी एक तीव्र इच्छा आहे. ती म्हणजे हा सोहळा आणि त्याचा इतिहास, त्याचं महत्व आपण मराठी जनांनी जगाला ओरडून सांगायला हवं. आणि तेवढ्यावर न थांबता जातीपातीच्या पलीकडं जाऊन महाराजांच्या काळातील महाराष्ट्राचं गतवैभव परत आणण्यासाठी एकत्र यायला हवं, झटायला हवं. अन्यथा हा सोहळा फक्त एक उपचार होईल, उत्सव होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.
बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसूट बघायला मिळत नाहीत कारण ते महापुरुष, त्यांचे विचार, त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडे महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमण्यामंध्ये सळसळत नाहीत म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते.
2 June ki Roti: भाग्यवान लोकांना मिळते 'दो जून की रोटी', सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या म्हणीचा अर्थ काय?
हे चित्र बदलण्यासाठी, प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल. ह्यासाठी मराठी जनांनी निर्धार करायला हवा, शपथ घ्यायला हवी आणि त्यासाठी राज्याभिषेक सोहळ्यापेक्षा उत्तम क्षण अजून कुठला असणार?, असंही शेवटी राज यांनी म्हटलं आहे.