मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Life Skills: या चैत्र नवरात्रीपासून सुरू करा हे ९ कामं, बदलेल तुमचं आयुष्य

Life Skills: या चैत्र नवरात्रीपासून सुरू करा हे ९ कामं, बदलेल तुमचं आयुष्य

Hiral Shriram Gawande HT Marathi
Mar 22, 2023 03:47 PM IST

तसं तर चांगले काम सुरू करण्यासाठी कोणत्याही मुहूर्ताची गरज नसते. जर तुमचा शक्तीवर विश्वास असेल तर तुम्ही या नवरात्रीपासून या ९ गोष्टींची सुरुवात करून तुमचं आयुष्य बदलू शकता. बहुतेक यशस्वी लोक असेच जगतात.

आयुष्य बदलवणाऱ्या चांगल्या सवयी
आयुष्य बदलवणाऱ्या चांगल्या सवयी

Healthy Habits: कोणत्याही कामाची सुरुवात करण्यासाठी नवरात्र हा दिवस चांगला मानला जातो. तसं तर नवं वर्ष सुरू झालं तरी तुम्ही काही संकल्प केले असतीलच. दोन महिने उलटून गेल्यानंतरही जर तुम्ही त्यांचे पालन करू शकला नाही, तर आणखी एक संधी आहे. आता २१ दिवस काही नियम पाळावे लागतील. हे आपले जीवन कायमचे बदलून टाकेल. तुम्हाला फक्त काही सवयी बदलाव्या लागतील आणि आपल्या दिनक्रमात काही नवीन सवयींचा समावेश करावा लागेल. त्यानंतर तुम्हाला जे हवं ते मिळेल.

असे येईल जग मुठीत

निरोगी शरीरात निरोगी डोकं असते हे तुम्ही लहानपणापासून ऐकत आहात. जर तुमचे बॉडी आणि माइंड निरोगी असेल तर तुम्ही जे कराल त्यात यशस्वी होण्याची शक्यता वाढते. जगातील बहुतेक यशस्वी लोकांमध्ये काही गोष्टी समान असतात. जसे की सकाळी लवकर उठणे, निरोगी खाणे, सक्रिय राहणे इत्यादी. वारंवार प्रयत्न करूनही दिनचर्या बदलता येत नसेल तर नवरात्रीपासून सुरुवात करा.

असा करा तुमचा दिवस मोठा

सकाळी लवकर उठलो तर इतरांपेक्षा जास्त वेळ मिळतो, असं तुम्ही अनेकदा वाचलं आणि ऐकलं असेल. अशा वेळी तुम्ही स्वत:ला असा वेळ देऊ शकता, जो तुम्ही दिवसभराच्या धावपळीत देऊ शकत नाही. स्वत:वर गुंतवलेला हा वेळ तुमच्या ग्रूमिंगमध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल.

अवघ्या ४५ मिनिटांत काम पूर्ण होईल

जगभरातील डॉक्टरांनी असे सुचवले आहे की, जर तुम्हाला दीर्घायुष्य जगायचे असेल तर व्यायाम करणे खूप महत्त्वाचे आहे. जेव्हा आपण व्यायाम करतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात, रक्ताभिसरण वाढते आणि हार्मोन्स बरोबर राहतात. यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील सक्रिय राहते आणि शरीरातील आजार थांबू देत नाही. तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही. आठवड्यातून फक्त ४५ मिनिटे ब्रिस्क वॉक म्हणजेच वेगाने चाला.

सूर्य मूड बनवेल

सूर्यप्रकाश शरीरासाठी खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे शरीराला व्हिटॅमिन डी बनते. तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी ते चांगले आहे. केवळ व्हिटॅमिन डीच नाही तर पुरेसा सूर्यप्रकाश न मिळाल्याने तुमची सेरोटोनिनची पातळी कमी होऊ शकते. यामुळे नैराश्याची लक्षणेही येऊ शकतात. जर ते जास्त गरम किंवा प्रखर नसेल तर तुम्ही दुपारी ११ नंतरही २० मिनिटे उन्हात घालवू शकता.

वृद्धापकाळासाठी शरीर करा मजबूत

दररोज लिंबू पाणी किंवा मोसंबी, संत्री यांसारखी लिंबूवर्गीय फळे आपल्या दिनचर्येचा एक भाग बनवा. तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहील तसेच म्हातारपणाची लक्षणे लवकर दिसणार नाहीत. तुती, सफरचंद, बेरी यासारखी हंगामी फळे आणि बीटरूट, पालक, ब्रोकोली, फ्लॉवर या भाज्या खाव्यात. त्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात जे शरीराला जुनाट आजारांपासून वाचवतात.

तरुण आणि तंदुरुस्त रहा

प्रथिने (डाळी, हरभरा, बीन्स) आणि कर्बोदके (गहू, तांदूळ) आणि चरबी (तूप) यांचा समावेश असलेला आहार घ्या. त्यासोबतच दही, ताक, पनीर हे प्रोबायोटिक स्वरूपात खाणे आवश्यक आहे. यामुळे तुमच्या शरीरात निरोगी बॅक्टेरिया येतात. आपल्या आहारात ओमेगा ३ फॅटी ऍसिडचा स्रोत असणे देखील महत्त्वाचे आहे. यासाठी तुम्ही अक्रोड, फ्लेक्ससीड किंवा चिया सीड्स खाऊ शकता. रेझवेराट्रोल बदाम आणि शेंगदाण्यात आढळते. हे एक अतिशय मजबूत अँटी ऑक्सिडंट मानले जाते. यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म आहेत.

आठवड्यातून एकदा सिस्टम ब्रेक करा

आठवड्यातून एकदा उपवास करणे आरोग्यासाठी चांगले असते. हे इंटरमिटेंट फास्टिंग म्हणून देखील पाहिले जाते. तुम्ही फक्त फळे खाऊन किंवा ज्यूस पिऊन दिवस जगू शकता. जर तुम्हाला आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर नक्कीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.

डोळे आणि मुद्रा खराब होणार नाहीत

जर तुम्ही दिवसभर बसून काम करत असाल तर मधेच ब्रेक घ्या. सतत बसणे, मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे आपल्या शरीरासाठी आणि डोळ्यांसाठी खूप हानिकारक आहे. मोबाईलच्या व्यसनामुळे तुमचा वेळ वाया घालवण्यासोबतच तुमच्या शरीरात हानिकारक रेडिएशनही जातात. याच्या प्रकाशामुळे डोळ्यांची दृष्टी खराब झाल्याच्या बातम्याही समोर आल्या आहेत. मोबाईलचा वेळ मर्यादित ठेवा.

अशा प्रकारे तुम्ही योग्य निर्णय घ्याल

अनेकांना ध्यान करणे कठीण जाते. दिवसभर वेळ मिळत नसेल तर झोपताना ध्यान करा. निरोगी राहण्यासाठी तणावमुक्त राहणे आवश्यक आहे. तणावमुक्त मन तुम्हाला योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यास सक्षम करेल. जे यशस्वी होण्यासाठी खूप महत्वाचे आहे.

धैर्य मिळेल

झोपण्याच्या २ तास आधी मोबाईलपासून अंतर ठेवा. देवाचे आभार माना. ज्यांचा काही शक्तीवर विश्वास आहे, त्यांना नैराश्य येण्याची शक्यता कमी असते.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

WhatsApp channel