Rang Maza Vegla: कार्तिकच्या बदल्याचा खेळ झाला सुरू! दीपाच्या जीवावर बेतणार? मालिकेत येणार ट्वीस्ट
Rang Maza Vegla latest Update: कार्तिक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आता १४ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आला असून, त्याच्या स्वभावात मोठा बदल झाला आहे.
Rang Maza Vegla latest Update: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत सध्या बदल्याचा खेळ सुरू झाला आहे. १४ वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आलेला कार्तिक आता दीपाचा बदला घेणार आहे. त्याचा हा डाव आता सुरू झाला आहे. आपल्याला शिक्षा दीपामुळेच झाली अशी मनाशी पक्की खुणगाठ बांधलेला कार्तिक आता दीपाला शक्य तितका त्रास देण्याचा प्रयत्न करणार आहे. याची सुरुवात आता झाली असून, कार्तिकचा हा डाव आता दीपाच्या जीवावर देखील बेतणार आहे.
कार्तिक न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून आता १४ वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर आला असून, त्याच्या स्वभावात मोठा बदल झाला आहे. दीपानेच बदल घेण्यासाठी मुद्दाम हा डाव रचला आणि आपल्याला तुरुंगात धाडलं असा कार्तिकचा समज झाला आहे. याचा सूड आता कार्तिक उगवत आहे. आता कार्तिकचं बदललेलं रूप सगळ्यांनाच पाहायला मिळणार आहे. कार्तिकचं हे नवं रूप पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. मालिका सध्या मनोरंजक वळणावर पोहोचली आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या येत्या भागात दीपाला एक अनोखळी व्यक्तीकडून फोन आला. या फोनमध्ये दीपाला एक धमकी देण्यात आली. इनामदारांच्या आदित्य हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याचे तिला सांगण्यात आले होते. या फोनमुळे संपूर्ण हॉस्पिटलमध्ये गदारोळ माजतो. सगळेच हॉस्पिटल बाहेर येतात. मात्र, एक लहान मुलगा हॉस्पिटलमध्येच राहिल्याने ती पुन्हा आत गेली. यावेळी बॉम्ब वजन काट्यात लावल्याचे तिच्या लक्षात आले. त्यामुळे बॉम्ब फुटू नये यासाठी दीपा स्वतः त्या वजन काट्यावर उभी राहिली.
सगळेच लोक सुखरूप हॉस्पिटल बाहेर आले. मात्र, दीपा अजूनही हॉस्पिटलमध्येच आहे. हा कार्तिकचा डाव असावा, असे अनेकांना वाटत आहे. कार्तिकनेच दीपाला त्रास देण्याचा विडा उचलला आहे. आता पुढे काय होणार हे मालिकेच्या येत्या भागात कळणार आहे.