Rang Maza Vegla: जीवघेणा हल्ला अन् आता किडनॅप; दीपाच्या आयुष्यात येणार मोठं संकट!
Rang Maza Vegla Latest Update: एकीकडे कार्तिक तिच्या जीवावर उठलेला असतानाच आता मालिकेत आणखी एका व्हिलनची एन्ट्री झाली आहे. कार्तिकच्या आयुष्यात आता आयेशाची देखील एन्ट्री झाली आहे.
Rang Maza Vegla Latest Update: टीव्ही विश्वातील लोकप्रिय मालिका ‘रंग माझा वेगळा’ सध्या एका वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. या मालिकेची नायिका अर्थात दीपा इनामदार हिच्यावर आता एकामागून एक संकटं कोसळत आहेत. एकीकडे कार्तिक तिच्या जीवावर उठलेला असतानाच आता मालिकेत आणखी एका व्हिलनची एन्ट्री झाली आहे. कार्तिकच्या आयुष्यात आता आयेशाची देखील एन्ट्री झाली आहे. या सगळ्यात दीपा इनामदार हिच्यावर मात्र नवं संकट येणार आहे. आता कार्तिकची ही नवी खेळी दीपाच्या जीवावर बेतणार आहे.
‘रंग माझा वेगळा’ या मालिकेच्या येत्या भागात हा नवा ट्रॅक पाहायला मिळणार आहे. यात दीपा घरात एका कार्यक्रमाची तयरी करताना दिसणार आहे. याची सगळी तयारी सुरू असताना दीपा केक आणण्यासाठी एका व्यक्तीला फोन करते. हा व्यक्ती आपण केक घेऊन आलो आहोत, असे सांगून दीपाला घराबाहेर बोलवतो. यावेळी दीपा केकची डिलिव्हरी घेण्यासाठी बाहेर गेली असता, तिला काही लोक बेशुद्ध करून गाडीत टाकतात. यानंतर आता दीपाला एका बंदिस्त जागी ठेवण्यात येणार असून, तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जाणार आहे. आता दीपाच्या जीवावर नक्की कोण उठलंय आणि ही खेळी नक्की कोण खेळतंय याचा खुलासा अद्याप झालेला नाही.
SRK Family Photos: आर्यन, सुहाना अन् अबरामचा स्वॅग.. शाहरुख खानचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल!
एकीकडे आपण न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगून कार्तिक इनामदार तब्बल १४ वर्षांनी तुरुंगाबाहेर आला आहे. मात्र, १४ वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर आता कार्तिक सुडाच्या भावनेनं पेटून उठला आहे. आपल्याला शिक्षा मिळण्यात दीपाचा मोठा हात आहे, असे त्याला वाटत आहे. यामुळेच दीपाचा बदला घेण्यासाठी आता कार्तिक दररोज नवनव्या खेळी खेळत आहे. दीपाला कसा त्रास देता येईल यासाठी कार्तिक नवनवे डाव आखत आहे. यासाठी त्याने दीपाला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
दीपाच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, हे सगळ्यांना पटवून देण्यासाठी कार्तिक सतत काहीना काही नव्या योजना बनवत आहे. एकीकडे कार्तिकचे हे प्रयत्न सुरू असतानाच आता त्यांच्या आयुष्यात आयेशाची देखील एन्ट्री झाली आहे. तब्बल १४ वर्षानंतर देखील आयेशा कार्तिकला मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आयेशाच्या परत येण्याने दीपा आणि कार्तिक यांच्यासह संपूर्ण इनामदार कुटुंबाच्या आयुष्यात मोठं वादळ येणार आहे.