Rang Maza Vegla: दीपा आणि आयेशा समोरासमोर येणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये मोठा ट्वीस्ट!
Rang Maza Vegla Latest Update:एकीकडे कार्तिक, कार्तिकी आणि श्वेता मिळून दीपाला त्रास देत आहेत. तर, त्यातच आता या मालिकेत आयेशाची एन्ट्री झाल्याने दीपाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे.
Rang Maza Vegla Latest Update:‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत पुन्हा एकदा व्हिलन ट्रॅक पाहायला मिळणार आहे. एक-दोन नव्हे तर आता या मालिकेत एकाच वेळी चार व्हिलन पाहायला मिळणार आहेत. एकीकडे कार्तिक, कार्तिकी आणि श्वेता मिळून दीपाला त्रास देत आहेत. तर, त्यातच आता या मालिकेत आयेशाची एन्ट्री झाल्याने दीपाची डोकेदुखी आणखी वाढणार आहे. आयेशा परतून आल्यामुळे आता मालिका रंगतदार वळणावर आली आहे. या मालिकेत आर्यनची एन्ट्री झाल्याने नक्कीच काहीतरी मोठं घडणार याचा अंदाज प्रेक्षकांना होताच. अखेर हा ट्वीस्ट आता समोर आलाच आहे.
१४ वर्षांपूर्वी आयेशामुळेचा कार्तिक आणि दीपाच्या आयुष्यात अनेक विघ्न आली होती. तर, आयेशामुळेच दीपा आणि कार्तिकचा संसार देखील मोडला होता. आता १४ वर्षांच्या मोठ्या लीपनंतर देखील आता आयेशा पुन्हा एकदा कार्तिकला मिळवण्याच्या उद्देशाने परत आली आहे. याची सुरुवात झालीये ती आर्यनपासून... दीपा आणि कार्तिक यांच्या मुली अर्थात दीपिका आणि कार्तिकी यांच्या आयुष्यात आर्यनने एन्ट्री केली आहे. आर्यन हा एकाचवेळी दीपिका आणि कार्तिकी दोघांना फसवत आहे. यामागे त्याचा काहीतरी मोठा डाव आहे.
आयेशाच्या अचानक झालेल्या एन्ट्रीमुळे आर्यनच्या कटावरून पडदा उघडला आहे. आर्यन हा आयेशाच्या बहिणीचा मुलगा असून, तो इनामदार कुटुंबावर सूड उगवण्यासाठी आला आहे. मात्र, तो आयेशाला कार्तिक आणि दीपापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे तिला होणारा त्रास कमी होईल, असे त्याला वाटत आहे. मात्र, आता आयेशा आणि दीपाची भेट होणार आहे. दोघी एकाचवेळी एकाच ठिकाणी आल्याने आता त्यांची भेट होणारच आहे. या भेटीमुळे मात्र दीपा आणि कार्तिकच्या आयुष्यात पुन्हा वादळ येणार आहे.
आता आयेशा आणि दीपा एकमेकींसमोर येणार का? आणि या दोघी एकत्र आल्याच तर मालिकेत पुढे काय घडणार? याकडे सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.‘रंग माझा वेगळा’या मालिकेचं कथानक आता १४ वर्षांनी पुढे गेलं आहे. या लीपनंतर आता मालिकेचं कथानक पुढे गेलं आहे. एकीकडे कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. तर,दुसरीकडे दीपाने कार्तिकी आणि दीपिकाला एकटीने वाढवले आहे. १४ वर्षांच्या या लीपनंतर आता कार्तिक शिक्षा भोगून तुरुंगाबाहेर आला आहे. यानंतर आता मालिकेत आयेशा देखील परतणार आहे. यामुळे मालिकेचं कथानक अतिशय रंगतदार वळणावर आलं आहे.