मराठी बातम्या  /  मनोरंजन  /  Rang Maza Vegla: आयेशा नकुलची मावशी असल्याचं सत्य दीपाला कळणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट

Rang Maza Vegla: आयेशा नकुलची मावशी असल्याचं सत्य दीपाला कळणार? ‘रंग माझा वेगळा’मध्ये नवा ट्वीस्ट

Harshada Bhirvandekar HT Marathi
Apr 25, 2023 08:22 PM IST

Rang Maza Vegla Latest Update: ‘नकुल’ आणि ‘आर्यन’ हे दोघे वेगळे नसून, एकच व्यक्ती आहे आणि तो आयेशाचा नातेवाईक आहे, हे आता दीपाच्या समोर येणार आहे.

Rang Maza Vegla
Rang Maza Vegla

Rang Maza Vegla Latest Update: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता नात्यांची गुंतागुंत समोर येणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं बदललेलं कथानक हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात हात नसताना देखील कार्तिकला या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली आहे. आता १४ वर्षानंतर कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. कार्तिक घरी आल्यानंतर वातावरण आता सगळंच चित्र बदललेलं दिसत आहे. एकीकडे दीपिका वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर झाली आहे. तर, कार्तिकी मात्र, प्रवाहाच्या विरोधात जाऊन सगळ्या गोष्टी करताना दिसत आहे.

१४ वर्षांच्या या लीपनंतर आता या मालिकेत कार्तिकी आणि दीपिका देखील २० वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झाली आहे. दोघींच्या आयुष्यात आलेला ‘आर्यन’ हा दुसरा तिसरा कुणी नसून आयेशाचा भाचा आहे. आपली मावशी अर्थात आयेशाचा बदला घेण्यासाठी आर्यन इनामदारांच्या आयुष्यात आला आहे. तो इनामदारांच्या घरात शिरून आता सगळ्यांनाच त्रास देणार आहे. तर, दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिका यांच्या आयुष्यात येऊन तो दोघींना फसवणार आहे.

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

साक्षीचा जीव घेणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून आयेशाच आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात दीपा आणि कार्तिकला अडकवणाऱ्या घाडगे वकिलाचा हा डाव असून, तो आता आयेशाचं नाव समोर आणणार आहे. एका केसमध्ये पैसे घेऊन खोटं बोलल्याबद्दल घाटगे वकील आणि कार्तिक यांच्यात वैर निर्माण झालं होतं. याचाच बदला घेण्यासाठी घाडगे वकिलाने हा डाव रचला होता. मात्र, या दरम्यान आयेशा कार्तिकपासून दुरावली. तर, आता आयेशा पूर्णपणे वेडी झाली आहे.

Rang Maza Vegla Latest Update: ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत आता नात्यांची गुंतागुंत समोर येणार आहे. ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेचं बदललेलं कथानक हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात हात नसताना देखील कार्तिकला या न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगावी लागली आहे. आता १४ वर्षानंतर कार्तिक तुरुंगातून बाहेर आला आहे. कार्तिक घरी आल्यानंतर वातावरण आता सगळंच चित्र बदललेलं दिसत आहे. एकीकडे दीपिका वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून डॉक्टर झाली आहे. तर, कार्तिकी मात्र, प्रवाहाच्या विरोधात जाऊन सगळ्या गोष्टी करताना दिसत आहे.

१४ वर्षांच्या या लीपनंतर आता या मालिकेत कार्तिकी आणि दीपिका देखील २० वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात एका नव्या मित्राची एन्ट्री झाली आहे. दोघींच्या आयुष्यात आलेला ‘आर्यन’ हा दुसरा तिसरा कुणी नसून आयेशाचा भाचा आहे. आपली मावशी अर्थात आयेशाचा बदला घेण्यासाठी आर्यन इनामदारांच्या आयुष्यात आला आहे. तो इनामदारांच्या घरात शिरून आता सगळ्यांनाच त्रास देणार आहे. तर, दुसरीकडे कार्तिकी आणि दीपिका यांच्या आयुष्यात येऊन तो दोघींना फसवणार आहे.

Aryan Khan: आर्यन बनला ‘पापा’ शाहरुख खानचा दिग्दर्शक; टीझरने वाढवली प्रेक्षकांची उत्सुकता!

साक्षीचा जीव घेणारी व्यक्ती दुसरी-तिसरी कुणी नसून आयेशाच आहे. साक्षीच्या मृत्यू प्रकरणात दीपा आणि कार्तिकला अडकवणाऱ्या घाडगे वकिलाचा हा डाव असून, तो आता आयेशाचं नाव समोर आणणार आहे. एका केसमध्ये पैसे घेऊन खोटं बोलल्याबद्दल घाटगे वकील आणि कार्तिक यांच्यात वैर निर्माण झालं होतं. याचाच बदला घेण्यासाठी घाडगे वकिलाने हा डाव रचला होता. मात्र, या दरम्यान आयेशा कार्तिकपासून दुरावली. तर, आता आयेशा पूर्णपणे वेडी झाली आहे.

|#+|

आयेशाला वेड लागलं आहे. १४ वर्षांपूर्वी कार्तिकपासून दुरावलेली आयेशा आता पुरती वेडी झाली असून, तिला कार्तिकच आपला पती असल्याचा भास होत आहे. ती स्वतःच्या आभासी जगात कार्तिकसोबत संसार थाटून त्यात रमली आहे. मात्र, आता तिचा सामना थेट दीपा इनामदारशी होणार आहे. ‘नकुल’ आणि ‘आर्यन’ हे दोघे वेगळे नसून, एकच व्यक्ती आहे आणि तो आयेशाचा नातेवाईक आहे, हे आता दीपाच्या समोर येणार का?, हे मालिकेच्या येत्या भागात पाहायला मिळणार आहे.

IPL_Entry_Point

विभाग