मराठी बातम्या  /  निवडणुका  /  Lok Sabha Elections 2024 Phase 1: महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान, जाणून घ्या मतदारसंघनिहाय टक्केवारी

Lok Sabha Elections 2024 Phase 1: महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान, जाणून घ्या मतदारसंघनिहाय टक्केवारी

Ashwjeet Rajendra Jagtap HT Marathi
Apr 19, 2024 08:46 PM IST

Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रात आज रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान झाले.

लोकसभा निवडणूक २०२४: महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झाले
लोकसभा निवडणूक २०२४: महाराष्ट्रात ५४.८५ टक्के मतदान झाले (HT)

Maharashtra Lok Sabha Election 2024 phase1: लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात शुक्रवारी महाराष्ट्रातील ५ जागांवर झालेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत सरासरी ५४.८५% टक्के मतदान झाले. ज्यात रामटेक लोकसभा मतदार संघ (Ramtek Lok Sabha Constituency), नागपूर लोकसभा मतदार संघ (Nagpur Lok Sabha Constituency), भंडारा- गोंदिया लोकसभा मतदार संघ (Bhandara-Gondia Lok Sabha Constituency), गडचिरोली- चिमूर लोकसभा मतदार संघ (Gadchiroli-Chimur Lok Sabha Constituency) आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात Chandrapur (Lok Sabha Constituency) आज मतदान झाले.दरम्यान, कोणत्या मतदार संघात किती टक्के लोकांनी मतदान केले, याची मतदारसंघनिहाय टक्केवारी जाणून घेऊयात.

chhagan bhujbal : नाशिक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून छगन भुजबळ यांची माघार, अचानक असं काय घडलं?

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली- चिमूर आणि चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. यात सर्वाधिक मतदान गडचिरोली- चिमूर मतदारसंघात झाले. गडचिरोली- चिमूर मतदारसंघात ५५.७९ टक्के मतदान झाले. तर, भंडारा- गोंदिया- ४५.८८, चंद्रपूर- ४३.४८, रामटेक- ४०.१० आणि नागपूरमध्ये ३८.४३ टक्के मतदान झाले.

माझ्या एनर्जीचा स्त्रोत सेक्स… महुआ मोइत्रा खरंच असं बोलल्या! काय आहे व्हायरल व्हिडिओ मागील सत्य?

नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात

लोकसभेच्या निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. ऑक्टोबर १९५१ ते फेब्रुवारी १९५२ या चार महिन्यांच्या भारतातील पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतरची ही सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक असेल. या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ही कामगिरी करणारे ते स्वतंत्र भारतातील दुसरे व्यक्ती ठरणार आहेत.

भाजपचा बहुमताचा दावा

२०१९ च्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने मोदींच्या अखिल भारतीय लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार होऊन एका पिढीत एकदा बहुमत मिळवले होते. पक्षाने ३०३ जागा जिंकल्या आणि एनडीएसह मित्रपक्षांसह ५४३ सदस्यांच्या कनिष्ठ सभागृहात ३३६ जागा जिंकल्या. मागील भ्रष्टाचाराचे ओझे आणि कर्तृत्ववान नेत्याच्या अभावामुळे दबलेल्या कॉंग्रेसला ५२ जागांवर समाधान मानावे लागले. यंदाच्या निवडणुकीत भाजप ४०० जागा जिंकणार, असा दावा त्यांच्या पक्षातील नेते करीत आहेत.

WhatsApp channel