मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  “रत्नागिरी-महाडच्या भुतांना बाटलीत बंद..”,अनंत गीतेंचा शिवसेना बंडखोरांवर निशाणा

“रत्नागिरी-महाडच्या भुतांना बाटलीत बंद..”,अनंत गीतेंचा शिवसेना बंडखोरांवर निशाणा

Jul 12, 2022, 04:10 PM IST

    • बंडखोरी करून गेलेले आमदार पुन्हा येणार नसून नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार यावेळी अनंत गीतेंनी बोलून दाखवला. गीते म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. तसे प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी करू नयेत.
अनंत गीते

बंडखोरी करून गेलेले आमदार पुन्हा येणार नसून नव्याने शिवसेना उभी करू,असा निर्धार यावेळी अनंत गीतेंनी बोलून दाखवला. गीते म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. तसे प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी करू नयेत.

    • बंडखोरी करून गेलेले आमदार पुन्हा येणार नसून नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार यावेळी अनंत गीतेंनी बोलून दाखवला. गीते म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. तसे प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी करू नयेत.

रत्नागिरी – एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्याने शिवसेना दुभंगली आहे. बंडखोरांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात सत्तापालट केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटातील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगत असताना दुसरीकडे स्थानिक पातळीवरील राजकारणावर देखील याचा प्रभाव पडताना दिसत आहे. 

ट्रेंडिंग न्यूज

Mumbai Weather Updates: मुंबईतील तापमान आज ३५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचणार, हवामान विभागाचा अंदाज

Weather Updates: छत्रपती संभाजीनगरात उष्णतेचा इशारा; विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता

Mumbai: पॅलेस्टाईनसमर्थक भूमिकेमुळे मुंबईतील शाळेच्या मुख्याध्यापिकेकडून राजीनामा मागितला!

Mumbai Local Fatka Gang: फटका गँगच्या विषारी इंजेक्शनमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस हवालदाराचा मृत्यू

शिवसेनेचा प्रभाव असणाऱ्या कोकणात या राजकीय घडामोडींचे पडसाद उमटू लागले आहेत. बंडखोरी केलेल्या कोकणातील आमदारांना शिवसेनेकडून लक्ष्य केलं जात असून शिवसेना नेते अनंत गीते यांनी या बंडखोरीवरून परखड शब्दांत टीका केली आहे. रत्नागिरीत झालेल्या निर्धार मेळाव्यात ते बोलत होते.

उद्धव ठाकरेंनी ते प्रयत्न आता सोडून द्यावेत - गीते

बंडखोरी करून गेलेले आमदार पुन्हा येणार नसून नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार यावेळी अनंत गीतेंनी बोलून दाखवला. गीते म्हणाले की, वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. तसे प्रयत्नही उद्धव ठाकरे यांनी करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू. बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या हातात आहे. त्यातला एकही परत येणार नाही. नारायण राणे, छगन भुजबळ यांनी केलेले बंड वैयक्तिक होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेले बंड भाजपप्रणित आहे. या बंडातून सामान्य जनतेला किंवा शिवसैनिकांना काहीही मिळणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेले हे आमदार बंडात सहभागी झाले आहेत, अशी टीका अनंत गीते यांनी केली आहे.

महाड-रत्नागिरीचं भूत?

दरम्यान, यावेळी बोलताना अनंत गीतेंनी महाड आणि रत्नागिरीच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत असल्याचा टोला लगावला. त्यांचा रोख नेमका कुणाकडे आहे? यावरून राजकीय चर्चा सुरू झाली असून तो योगेश कदम आणि उदय सामंत या दोन बंडखोर आमदारांच्या दिशेने असल्याचं बोललं जात आहे.

गीते म्हणाले की, मी अलिबागच्या सभेत सांगितलंय की महाडच्या भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद माझ्यात आहे. तुमच्या रत्नागिरीच्या भुतालाही बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे. कुठल्याही भुताला बाटलीत बंद करण्याची ताकद शिवसेनेत आहे. चिंता करण्याचं काही कारण नाही.