मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Chanakya Niti: सकाळी या गोष्टी केल्याने पोहचाल यशाच्या शिखरावर!

Chanakya Niti: सकाळी या गोष्टी केल्याने पोहचाल यशाच्या शिखरावर!

May 29, 2023, 06:13 AM IST

    • Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.
चाणक्य नीती

Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

    • Acharya Chanakya: आचार्य चाणक्य यांनी नीती शास्त्रामध्ये जवळपास प्रत्येक क्षेत्राशी संबंधित गोष्टींचा उल्लेख केला आहे.

Chanakya Niti: महान अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी अर्चाय चाणक्य यांनी मानवी जीवनाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्याची धोरणे माणसाला जीवनातील योग्य मार्ग दाखवतात. एक म्हण आहे की जो वेळेचा पक्का असतो, त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. दिवसाची सुरुवात चांगली असेल तर सर्व कामे पूर्ण होतात. चाणक्य मानतात की दिवसाची शुभ सुरुवात करण्यासाठी काही गोष्टींचे पालन केले पाहिजे तरच जीवनात यश मिळते. ज्यांना वेळेची किंमत कळते ते आयुष्यात कधीच अपयशी होत नाहीत. चाणक्य नुसार, जर तुम्ही रोज सकाळी उठल्यानंतर या गोष्टींचे पालन केले तर तुमचे यश निश्चित आहे.

ट्रेंडिंग न्यूज

World Thalassemia Day 2024: का साजरा केला जातो जागतिक थॅलेसेमिया दिन? जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि यंदाची थीम

Mother's Day 2024: या धार्मिक स्थळांवर तुमच्या आईसोबत साजरा करा मदर्स डे, नेहमी लक्षात राहील हा दिवस

World Asthma Day 2024: दम्याचे व्यवस्थापन कसे करावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला

Aam Pora Recipe: चवीला अप्रतिम लागते बंगाल स्टाईल आम पोरा, सर्वांना आवडेल ही रेसिपी

दररोज लवकर उठणे

रात्री उशिरा झोपणे आणि सकाळी उशिरा उठणे हे तुमच्या आरोग्यासाठी आणि करिअरसाठी खूप हानिकारक आहे. चाणक्य म्हणतात की लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही यशाची पहिली पायरी आहे. सकाळी लवकर उठल्यामुळे वेळेवर काम पूर्ण करणे सोपे जाते.

नियोजन करा

चाणक्यानुसार, सकाळी उठल्यानंतर दिवसभराचे नियोजन करा. आपल्या संपूर्ण दिवसाच्या कामाचे नियोजन करणाऱ्या व्यक्तीला आपले ध्येय साध्य करण्यात फारशी अडचण येत नाही. यामुळे वेळेचा अपव्यय होणार नाही व सर्व कामे वेळेत पूर्ण होतील.

आरोग्याची काळजी घ्या

आरोग्याशी कधीही तडजोड करू नका, कारण जर तुम्ही आरोग्याबाबत बेफिकीर असाल तर आजार तुम्हाला घेरतात. आजारी व्यक्ती इच्छा असूनही आपले ध्येय साध्य करू शकत नाही. शरीरात ऊर्जा असेल तरच ते काम करू शकेल. म्हणूनच रोज योगा करा, व्यायाम करा, पौष्टिक आहार घ्या.

(Disclaimer : येथे प्रदान केलेली माहिती केवळ गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. येथे नमूद करणे महत्त्वाचे आहे की 'हिंदुस्तान टाइम्स मराठी' कोणत्याही प्रकारच्या ओळखीची, माहितीची पुष्टी करत नाही.)

विभाग