climate change : पाकिस्तानच्या मिरची उत्पादनाच्या आगाराला हवामान बदलाचा फटका; पाहा फोटो
Pakistan’s chili capital struggles with climate change : मिरचीच्या उत्पादनात पाकिस्तानचा जगत चौथा क्रमांक लागतो. पाकिस्तानमध्ये तब्बल १५००,००० एकर (६०,७०० हेक्टर) क्षेत्रावर दरवर्षी १४३,००० टन मिरचीचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या मिरचीच्या आगाराला आता हवामान बदलाचा फटका बसत आहे. वाढत्या तपमानामुळे मिरचीच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. यामुळे पाकिस्तानच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होत आहे.
(1 / 5)
मिरचीच्या उत्पादनासाठी पाकिस्तान जगात चौथ्या क्रमांकावर आहे. तब्बल १५०,००० एकर (६०,७०० हेक्टर) क्षेत्रावर वार्षिक १४३,००० टन मिरचीचे उत्पादन केले जाते, असा अहवाल रॉयटर्सने दिला आहे. १८ मार्च रोजी पाकिस्तानमधील कुंरी येथे एका शेतकऱ्याने संकरित लाल मिरची मिरचीची लागवड केली.(Akhtar Soomro / REUTERS)
(2 / 5)
१५ ऑक्टोबर रोजी कुणरी येथे आलेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला. सध्या मिरची लागवडीसाठी शेट जमिनीची खुरपणी करण्यास शेताऱ्यांनी विश्रांती दिली आहे. या परिसरातील वाढत्या तापमानामुळे मिरचीचे पीक घेणे कठीण झाले आहे. मिरची उत्पादनासाठी मध्यम हवामान गरजेचे आहे.(Akhtar Soomro / REUTERS)
(3 / 5)
१५ ऑक्टोबर रोजी कुंरी येथे पावसाळ्यात आलेल्या पुराच्या वेळी पावसाच्या पाण्यात बुडून खराब झालेले लाल मिरची.(Akhtar Soomro / REUTERS)
(4 / 5)
१६ ऑक्टोबर २०२२ रोजी कुंरी, उमरकोट येथे एक कामगार पावसाच्या पाण्यामुळे आणि पुरामुळे खराब झालेले कापसाचे रोपे जाळत आहे. काही महिन्यांपूर्वी त्याच्या शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर कुणरी येथील शेतकरीअसलेले फैसल गिल यांनी मिरची पीक वाचवण्यासाठी आपल्या कापूस पिकाचा त्याग करत ते पेटवून दिले.(Akhtar Soomro / REUTERS)
इतर गॅलरीज