Skin Care Tips: ब्रायडल मेकअप रिमूव्ह केल्यानंतर त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी!
Bridal Makeup: लग्नाच्या दिवशी वधूचा मेकअप खूप हेवी असतो. अनेक वेळा केमिकलयुक्त सौंदर्यप्रसाधनांच्या अतिवापरामुळे त्वचेचे खूप नुकसान होते. अशा परिस्थितीत, मेकअप रिमूव्ह केल्यानंतर त्वचेची कोणत्या प्रकारे काळजी घेऊ शकता ते जाणून घ्या.
Wedding Day Makeup: लग्नाच्या दिवशी सुंदर दिसावे अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. म्हणूनच लग्नाच्या दिवशी वधूचा मेकअप खूप हेवी केला जातो. पण दुसऱ्या दिवशी हा मेकअप काढला की त्वचा अतिशय निस्तेज आणि निर्जीव दिसू लागते. अनेक वेळा केमिकलच्या अतिवापराचा त्वचेवर खूप वाईट परिणाम होतो. त्यामुळे त्वचेवर पिंपल्स, डाग आणि त्वचेशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही त्वचेला योग्य पोषण देणं गरजेचं आहे. यामुळे त्वचा निस्तेज आणि निर्जीव दिसणार नाही. वधूचा मेकअप रिमूव्ह केल्यानंतर तुम्ही तुमच्या त्वचेची कोणत्या प्रकारे काळजी घ्यावी ते जाणून घ्या.
मूलभूत त्वचेची काळजी घ्या
क्लीनिंग आणि टोनिंग अशा गोष्टी आहेत ज्या आपण जवळजवळ दररोज पाळतो. चेहरा स्वच्छ करण्यासाठी सौम्य क्लिंजर वापरा. दिवसातून किमान दोनदा चेहरा स्वच्छ करा. यामुळे तुमच्या त्वचेवर घाण किंवा अतिरिक्त तेल जमा होणार नाही. यानंतर टोनर वापरा. यामुळे तुमची त्वचा हायड्रेटेड आणि फ्रेश राहण्यास मदत होईल. त्यामुळे पीएच पातळी राखण्यास मदत होईल. टोनर म्हणून तुम्ही गुलाबपाणी देखील वापरू शकता.
सनस्क्रीन
बाहेर जातानाच सनस्क्रीन वापरावे असे नाही. तुम्ही घरी असतानाही सनस्क्रीन वापरू शकता. हे आपल्या त्वचेला हानिकारक अतिनील किरणांपासून वाचविण्यात मदत करेल. यामुळे तुमच्या त्वचेवर टॅनिंग होणार नाही. तुमच्या चेहऱ्यानुसार सनस्क्रीनचा प्रकार निवडा.
असं त्वचेचं पोषण करा
त्वचेचे पोषण करण्यासाठी तुम्ही फेस ऑइल आणि फेस सीरम वापरू शकता. याशिवाय, तुम्ही शीट मास्क देखील वापरू शकता. तुम्ही काही काळ चेहऱ्याच्या तेलाने त्वचेला मसाज करू शकता. यामुळे रक्ताभिसरण सुधारते. यामुळे तुमची त्वचा निरोगी राहण्यास मदत होईल. आपण शीट मास्क आठवड्यातून २ ते ३ वेळा वापरू शकता. तर तुम्ही रोज फेस सीरम वापरू शकता.
मॉइश्चरायझर
कोरडी त्वचा टाळण्यासाठी मॉइश्चरायझर वापरण्यास विसरू नका. यामुळे तुमची त्वचा मऊ तर राहतेच पण त्याचबरोबर त्वचा हायड्रेटही राहते. ऋतू आणि त्वचेनुसार स्वतःसाठी मॉइश्चरायझर निवडा.
पुरेसे पाणी प्या
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. दिवसातून सुमारे ७ ते ८ ग्लास पाणी प्यायला हवे. यामुळे तुमची त्वचा निरोगी आणि चमकदार राहील.
विभाग