Rang Majha Vegla: १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका, ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत येणार लीप
Rang Majha Vegla: आता १४ वर्षानंतर मालिकेत पाहायला मिळणार नात्यांचे बदलते रंग. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळतेय.
स्टार प्रवाह वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणून ‘रंग माझा वेगळा’ पाहिली जाते. मालिकेत अनेक वेगवेगळे ट्वीस्ट पाहायला मिळतात. दिपा आणि कार्तिकच्या आयुष्यात काय सुरु आहे हे जाणून घ्यायला प्रेक्षक उत्सुक असतात. आता मालिकेत नात्यांचे बदलते रंग पाहायला मिळणार आहेत.
‘रंग माझा वेगळा’ मालिकेत लीप येणार असून कथानक १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे. सध्या मालिकेत कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे. न्यायालयाच्या निर्णयासमोर दीपाही हतबल झालीय.
वाचा: द कश्मीर फाइल्सला दादासाहेब फाळके पुरस्कार मिळताच प्रकाश राज यांनी केले ट्वीट
काही दिवसांपूर्वीच दोघांमधील गैरसमज दूर होऊन त्यांनी आपल्या नात्याची नवी सुरुवात केली होती. मात्र दीपा-कार्तिकचा आनंद नियतीला मान्य नव्हता. त्यामुळे पुन्हा एकदा दोघंही एकमेकांपासून दुरावलेत. दुराव्याच्या याच वळणावर मालिकेचं कथानकही १४ वर्षांनी पुढे सरकणार आहे.
या १४ वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. दीपिका-कार्तिकी मोठ्या झाल्या आहेत. १४ वर्षांची शिक्षा भोगून कार्तिकची सुटका होईल. मात्र आता दीपाचा वनवास सुरु होणार आहे. यामागे नेमकं काय कारण असेल? कार्तिकने दीपाला माफ केलं का? काय असेल या दोघांच्या नात्याचं भवितव्य? हे मालिकेच्या पुढील भागांमधून पाहायला मिळेल.
विभाग